आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडित वीजपुरवठा सुरू होणार:विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ हाेणार आहे. इच्छुकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ किंवा त्यापूर्वी मंजूर झाले आहेत, त्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे.

बातम्या आणखी आहेत...