आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी बाबूराव वाल्मीक दारवंटे (४०) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना कोरडगाव शिवारातील गट नं ९७ मध्ये गुरुवारी (४ मे) रात्री उशिरा उघडकीस आली.
खंडाळा येथील शेतकरी बाबूराव दारवंटे यांची खंडाळा शिवारात शेती अाहे. परंतु, कायम स्वरुपी पावसाचे प्रमाण कमी अधीक असल्याने त्यांनी ही शेती विकून कोरडगाव शिवारात साडेचार एकर शेती तीन वर्षांपूर्वी खरेदी केली हाेती.
शेती खरेदी करण्यासाठी त्यांनी नॅशनल बँकेकडून तसेच शेतीत उत्पन्न झाले की फेडेल, या आशेवर त्यांनी काही खासगी कर्जदेखील घेतले होते. परंतु, सततची नापिकीमुळे कर्ज फेडने अवघड तर झालेच त्यातच कर्जाचा डोंगर वाढतच हाेता. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून कर्ज कसे फेडावे या चिंतेत हाेते.
दरम्यान, त्यांनी काेरडगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच शिऊर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला अाणि मृतदेह शिऊर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर खंडाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.