आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणने केली कारवाई:तीन महिन्यांत 50 लाख युनिटची वीज चोरी उघड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजचोरी रोखण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून महावितरणने तीन महिन्यांत ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस आणली आहे.महावितरणच्या फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. प्रामुख्याने वीज चोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले.

त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती काढत कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून ५ दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून अशा ५० हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीज आहे.

बातम्या आणखी आहेत...