आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्याची चिंता:ईएसआयसी हॉस्पिटलला213 डॉक्टर,‎ कर्मचाऱ्यांची गरज; सध्या 122 कार्यरत‎

प्रवीण ब्रह्मपूरकर | छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने हॉस्पिटल चालवायला घेण्याचा खासदार इम्तियाज यांचा प्रस्ताव‎

चिकलठाण्यातील ईएसआयसी हॉस्पिटल‎ (कामगार विमा रुग्णालय) छत्रपती‎ संभाजीनगर जिल्ह्यातील कामगारांसाठी‎ महत्त्वाचे आहे. २ लाख २४ हजार ७५१ कामगार‎ आणि त्यांचे कुटुंबीय अशा एकूण ११ लाख‎ लोकांसाठी महत्त्वाचे आहे. येथे रुग्णसेवेसाठी‎ डॉक्टरपासून कर्मचाऱ्यापर्यंत २१३ जणांची गरज‎ आहे. त्यापैकी फक्त १२२ जण कार्यरत आहेत.‎ एकीकडे दरमहा रुग्णसंख्या वाढत असताना ४२‎ टक्के मनुष्यबळावर काम सुरू आहे. या‎ तुटवड्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत‎ असल्याने हे रुग्णालय केंद्राच्या योजनेत‎ समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार‎ इम्तियाज जलील यांनी केली आहे. ती पूर्ण‎ झाल्यास १०० बेडचे हे रुग्णालय २०० बेडचे‎ होईल. अनेक सुविधाही वाढतील.‎ छत्रपती संभाजीनगरमध्ये १९९७ मध्ये राज्य‎ कामगार विमा रुग्णालय सुरू झाले. सुरुवातीच्या‎ काळात डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्याने ते‎ रुग्णासाठी आधार ठरत होते. मात्र डॉक्टरांची‎ बदली, निवृत्तीनंतर पुन्हा भरती झाली नसल्याने‎ अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.‎

एमआरआय, सीटी‎ स्कॅनची सुविधा‎ मुंबईत कांदिवलीतील‎ कामगार विमा रुग्णालय‎ केंद्रीय आरोग्य विभागामार्फत‎ चालवले जाते. त्याच धर्तीवर‎ चिकलठाण्याचे रुग्णालयही‎ केंद्राने चालवले एमआरआय,‎ सीटी स्कॅन,आयसीयू,‎ डायलिसिस सारख्या इतर‎ अनेक सुविधा मिळू‎ शकतील. मी त्यासाठी‎ पाठपुरावा करत असल्याचे‎ खासदार इम्तियाज म्हणाले.‎

अनेक वर्षांपासून पाठपुरावा‎ हे रुग्णालय केंद्राकडे द्यावे यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून‎ पाठपुरावा करत आहोत. मात्र, छत्रपती संभाजीनगरचा निर्णय होत‎ नाही. तो झाला तर लाखो कामगारांना फायदा होईल.‎ - विनोद फरताडे, स्थायी समिती सदस्य, ईएसआय कॉर्पोरेशन‎

डॉक्टरांची ६० टक्के पदे रिक्त‎ १ लाख १८ हजार २१ रुग्णांच्या रक्त-लघवीची‎ तपासणी येथे वर्षभरात झाली आहे.‎ ईएसआयसीमध्ये रुग्णांची संख्या वाढत‎ असताना डॉक्टरांची संख्या मात्र सातत्याने कमी‎ होत आहे. म्हणून कंत्राटी डॉक्टरांच्या‎ माध्यमातून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला‎ जातो. येथील डाॅक्टरांची १० पैकी ६ जागा रिक्त‎ आहेत. केवळ चार डाॅक्टरांवर रोजच्या‎ रुग्णसेवेचा भार पडत आहे. पुढील महिन्यात‎ चारही डॉक्टर निवृत्त होणार आहेत. चतुर्थ‎ श्रेणीतील ११७ पैकी ७४ जागा रिक्त आहेत. हे‎ प्रमाण ६३ टक्के इतके आहे. या रुग्णालयात‎ एकूण २१३ पैकी ९१ पदे रिक्त आहेत.‎

डाॅक्टरांच्या ६ जागा रिक्त, उऱलेले ४ मेमध्ये होणार निवृत्त‎
ओपीडीची वेळ वाढवल्याने‎ रुग्णांची संख्या वाढली‎ २१ ते २५ हजार (दिव्यांग) वेतन‎ असणाऱ्यांना या रुग्णालयाचा लाभ‎ ‎ मिळतो. वैद्यकीय‎ ‎ अधीक्षक डॉ.‎ ‎ शिवाजी भोसले‎ ‎ म्हणाले की,‎ ‎ वर्षभरापूर्वी नऊ ते‎ ‎ एक वाजेपर्यत‎ असणारी ओपीडीची (बाह्य रुग्ण‎ तपासणी) वेळ आता नऊ ते‎ साडेचार केली आहे. तसेच त्वचा,‎ मानसिक आजार, आयुर्वेदासह इतर‎ उपचार सुरू केल्यानेही रुग्णसंख्या‎ वाढली आहे. सध्या नऊ‎ रुग्णालयाशी करार आहे. वर्षभरात‎ ९७ हजार जणांवर उपचार झाले.‎ रिक्त जागांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे‎ पाठवला