आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकाचे पाऊल:मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन विकूनसुद्धा‎ फिटेना; कडेठाणच्या शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या‎

आडूळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन विकूनही‎ फिटत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विष‎ ‎ प्राशन करून आत्महत्या केली. ही‎ ‎ घटना कडेठाण (ता. पैठण) येथे‎ ‎ बुधवारी (३ मे) सकाळी उघडकीस‎ ‎ आली.

काकासाहेब निवृत्ती तवार‎ ‎ (61 ) असे विष घेऊन आत्महत्या‎ ‎ केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.‎ ‎ काकासाहेब तवार यांची कडेठाण‎ ‎ शिवारात 3 एकर शेती आहे. त्यात ते‎ हंगामी पिके घेतात. मात्र, उत्पन्न कमी व खर्च जास्त‎ होत असल्याने तिन्ही मुलीच्या लग्नासाठी घेतलेले‎ कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते होते. कर्ज‎ फेडण्यासाठी शेवटी त्यांनी काही जमीन‎ विक्रीदेखीलकेली होती. मात्र, तरी कर्ज फिटले नाही.‎

घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी‎ घटनास्थळी येऊन ग्रामीण रुग्णालयात‎ शवविच्छेदनासाठी हलवले. दुपारी कडेठाण येथे‎ त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले . याप्रकरणी पाचोड‎ ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. सहायक‎ पाेलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनात बीट‎ जमादार संतोष चव्हाण तपास करताहेत .‎ काकासाहेब तवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन‎ विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.‎

कर्जामुळे आत्महत्या

वडिलांच्या डोक्यावर 5 लाखांचे कर्ज‎ वडील काकासाहेब तवार यांच्याकडे खासगी‎ उसनवारीचे तीन लाख व एसबीआय बँकेचे दोन लाख‎ असे जवळपास 5 लाख रुपयांचे कर्ज होते.‎

-विश्वास तवार, मृत शेतकरी यांचा मुलगा

विवंचनेत वावरत हाेते

कर्ज फिटत नव्हते, उलट‎ कर्जाचा डोंगर वाढत गेला‎ सततच्या नापिकी व अवेळी‎ झालेल्या अवकाळी पावसामुळे‎ सलग तीन-चार वर्षांपासून‎ शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात‎ उत्पन्नाचे शेतीशिवाय दुसरे साधन‎ नसल्याने काकासाहेब निवृत्ती तवार‎ यांच्यावर असलेले कर्ज फिटत‎ नव्हते, उलट कर्जाचा डोंगर वाढतच‎ होता. या विवंचनेत ते अनेक‎ दिवसांपासून वावरत हाेते.

-प्रतिभा‎ संभाजी तवार, सरपंच, कडेठाण

सहा एकरपैकी राहिली फक्त तीन एकर शेती‎ ​​​​​​​
कापसाला भाव मिळाला‎ नाही म्हणून होते हतबल‎ काकासाहेब तवार यांनी तीन एकरात‎ त्यांना २० क्विंटल कापूस झाला.‎ भाव मिळेल या आशेवर त्यांनी खूप‎ दिवस कापूस घरातच ठेवला होता.‎ परंतु, कर्ज डोक्यावर असल्याने‎ परतफेड करण्यासाठी त्यांना कापूस‎ विकावा लागला. कापसाला केवळ‎ ६ हजार भाव मिळाला. भाव कमी‎ अन् खर्च जास्त झाला. यामुळे ते‎ हतबल झाले होते, असे त्यांच्या‎ नातेवाइकांनी सांगितले.‎
आडूळला जाऊन आणले कीटकनाशक‎

काकासाहेब तवार हे मंगळवारी (२ मे) सकाळी आडूळ‎ येथील आठवडी बाजाराला जात असल्याचे सांगून घरातून‎ बाहेर पडले हाेते. त्यांनी आडूळला जाऊन पिकाच्या‎ फवारणीसाठी म्हणून औषधी खरेदी केले. यानंतर कडेठाण‎ शिवारातील शेतीकडे गेले अाणि त्यांच्या शेताशेजारील‎ शेतात विष प्राशन केले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी‎ परतले नसल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते‎ सापडले नाहीत. बुधवारी सकाळी परत त्यांचा शोध सुरू‎ केला असता त्यांचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ आढळला.‎