आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सावकाराच्या त्रासामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल‎

अंबड/जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजाच्या पैशांची‎वारंवार मागणी करत‎ मारहाण करून जिवे मारण्याची धमकी‎ दिल्यामुळे ३० वर्षीय शेतकऱ्याने‎ विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.‎ अंबड तालुक्यातील पागीरवाडी‎ शिवारात ९ मार्च रोजी ही घटना घडली.‎

भारत काळे असे मृताचे नाव आहे.‎ याप्रकरणी मृताची पत्नी उषा काळे‎ यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून‎ शिवाजी भोजने, कुंडलिक शिवाजी‎ भोजने, रख्माजी कुंडकर व केकेबाबा‎ भोजने यांच्याविरुद्ध अंबड पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. दरम्यान, पैशासाठी तिघांनी‎ पतीला मारहाण केल्याचे मृताच्या पत्नीने‎ तक्रारीत म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...