आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसनवारीची गरज नाही:अखेर दोन महिन्यांनंतर 70% शाळांना‎ केले शालेय पोषण आहाराचे वितरण‎

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या‎ विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार‎ देण्यासाठी शाळांवर गेल्या दीड-दोन‎ महिन्यांपासून उसनवारीची वेळ आली‎ होती. कारण, पोषण आहारासाठी‎ लागणारी डाळ, तांदूळ, तेल,‎ तिखटमीठही संपले होते. हा शालेय‎ पाेषण आहार शासन स्तरावरून वाटप‎ केला नाही. त्यामुळे लोकसहभागातून‎ मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची वेळ‎ शाळांवर आेढवली हाेती. अखेर‎ सोमवारी जिल्ह्यातील ७० टक्के‎ शाळांना शालेय पोषण आहाराचे‎ साहित्य वाटप सुरू केले असून,‎ उर्वरित ३० टक्के शाळांना दोन‎ दिवसांत पुरवठा करणार असल्याचे‎ शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ जिल्ह्यातील ३१६५ शाळांतील ४‎ लाख ६५,८६२ विद्यार्थ्यांना शालेय‎ पोषण आहार दिला जाताे.

पहिली ते‎ पाचवीसाठी प्रति विद्यार्थी १०० ग्रॅम‎ तांदूळ, २० ग्रॅम डाळ, तर सहावी ते‎ आठवीसाठी प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम‎ तांदूळ, ३० ग्रॅम डाळ असे प्रमाण आहे.‎ या आहाराचे पटसंख्येनुसार वाटप केले‎ जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात शालेय‎ पोषण आहाराचे साहित्य संपले होते.‎ त्यामुळे शाळांना सुट्या लागण्यासाठी‎ महिनाभराचा अवधी बाकी असल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्ह्यातील ३,१६५ शाळांतील‎ विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार उपलब्ध‎ करून देण्याची मागणी शिक्षकांनी‎ केली हाेती.‎ शिक्षण विभागाने प्राथमिक‎ शाळांतील विद्यार्थ्यांचे पोषण योग्य‎ पद्धतीने व्हावे, त्यांनी शाळेत नियमित‎ उपस्थित राहावे, त्यासाठी पहिली ते‎ आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय‎ पोषण आहार योजना सुरू केली आहे.‎

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३,१६५‎ शाळांतील ४ लाख ६५,८६२‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांना आहार दिला जाताे.‎ कोरोनाकाळात पोषण आहार वाटपात‎ अनेक अडचणी होत्या. मात्र, शाळा‎ सुरू झाल्यानंतर नियमित पोषण आहार‎ देणे सुरू झाले. त्यात पुन्हा स्वयंपाकी‎ व मदतनिसांचे मानधन थकल्याने‎ पोषण आहार बंद झाला होता.‎ गेल्या दोन महिन्यांत शासन स्तरावर‎ कराराची प्रक्रिया न झाल्यामुळे‎ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी‎ शाळांवर उसनवारी करण्याची वेळ‎ आली होती. अजून शाळांना सुट्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लागण्यासाठी एक महिन्याचा‎ कालावधी बाकी असल्याने‎ मुख्याध्यापकांनी लोकसहभाग व इतर‎ शाळांची मदत घ्यावी लागली.

तर‎ काही शाळांमध्ये थोडाफार पुरवठा‎ बाकी होता. मात्र, दोन महिने हीच‎ परिस्थिती कायम राहिल्याने शाळा‎ स्तरावर रोष निर्माण झाला होता.‎ त्यावर शाळांनी सुट्या लागेपर्यंतच्या‎ पोषण आहाराची तरतूद करावी, अशी‎ मागणी होत होती. अखेर ३ एप्रिलला‎ शाळांना पोषण आहाराचे साहित्य‎ वाटप सुरू असल्याचे शिक्षण‎ अधिकाऱ्यांनी सांगितले. हा शालेय‎ पोषण आहार संबंधित शाळेच्या‎ मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाटप‎ करण्याचे काम सुरू केले आहे.‎ त्यामुळे याचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ‎ घेतला आहे.‎