आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना कर्जवाटप:पंतप्रधान स्वनिधी योजनेतील लाभार्थींचा मेळावा ‎; विद्यार्थिनीचा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांना प्रश्न‎

छत्रपती संभाजीनगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरांप्रमाणे ग्रामीण भागात राहणाऱ्या‎ महिलांच्या प्रगतीसाठी बँकेच्या योजना‎ नाहीत का, बँकांच्या विविध कर्ज‎ प्रकरणांमध्ये दलालांचा वाढलेला‎ सुळसुळाट रोखण्यासाठी राष्ट्रीयीकृत‎ बँकांकडून कुठले प्रयत्न केले जातात,‎ असा सवाल विधी अभ्यासक्रमाच्या‎ विद्यार्थिनी वैष्णवी मुळे हिने केंद्रीय अर्थ‎ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर‎ उपस्थित केला.‎ ‘एसबीआय’तर्फे पंतप्रधान स्वनिधी‎ आर्थिक समावेशन वित्तसाह्य‎ अभियानांतर्गत ‘एमजीएम’मध्ये लाभार्थी‎ मेळावा आयोजित करण्यात आला होता.‎ या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई‎ विभागाच्या कार्यकारी व्यवस्थापक मेरी‎ सगाया धनपाल, स्टेट बँक ऑफ इंडियाचे‎ छत्रपती संभाजीनगरचे‎ उपमहाव्यवस्थापक रविकुमार वर्मा,‎ जिल्हा अग्रणी बँकेचे मंगेश केदार,‎ महापालिकेचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी‎ यांसह मोठ्या प्रमाणात महिला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लाभार्थींची उपस्थिती होती.

मेळावा‎ संपल्यानंतर विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण‎ घेणारी विद्यार्थिनी वैष्णवी मुळे हिने‎ व्यासपीठावर जाऊन बँकेचे अधिकारी व‎ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रश्न विचारले. ‘सर्व कार्यक्रम शहरात‎ होतात आणि सर्व कर्जाचा लाभ हा शहरी‎ महिलांना होत असेल तर ग्रामीण‎ महिलांच्या विकासासाठी शासन काय‎ करते,’ असा प्रश्न तिने विचारला.‎ ‘संबंधित कर्जाच्या योजनांमागे सर्वत्र‎ दलालांचा सुळसुळाट असून अशा‎ दलालांना रोखण्यासाठी बँक काय‎ उपाययोजना करते? कर्ज प्रकरण मंजूर‎ झाल्यावर अनेक महिलांकडून ५० टक्के‎ रक्कम संबंधित दलाल ठेवून घेतात.

असे‎ प्रकार रोखण्यासाठी शासन अथवा बँक‎ कुठल्या उपाययोजना करते,’ असाही‎ प्रश्न तिने उपस्थित केला.‎ एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी‎ रविकुमार, मेरी सगाया व केंद्रीय अर्थ‎ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उत्तरे दिली.‎ ग्रामीण भागातील महिलांच्या‎ विकासासाठी केंद्र सरकार राबवत‎ असलेल्या योजना डॉ. कराड यांनी‎ सांगितल्या. महिलांच्या बचत गटांना‎ विशेष करून लाभ दिला जात असल्याची‎ आकडेवारी त्यांनी वाचून दाखवली.‎ बँकेमध्ये येणाऱ्या महिलांची कर्ज‎ प्रकरणे ही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने‎ मंजूर केली जातात. दलालांना येथे थारा‎ दिला जात नाही. महिलांनी अधिकाऱ्याला‎ भेटूनच कर्ज प्रकरणे पूर्ण करावीत, असे‎ आवाहनही त्यांनी केले.‎

लाभार्थींना डाॅ. भागवत कराड यांच्या‎ हस्ते कर्ज वितरण करण्यात आले.‎ नियमित परतफेड केल्यास आणखी कर्ज‎ मुंबईत केवळ ९ हजार महिलांनाच योजनेचा लाभ देण्यात आला होता. आम्ही मेळावे‎ घेऊन दीड लाख महिलांना ‘पीएम स्वनिधी’चा लाभ मिळवून दिला. छत्रपती‎ संभाजीनगरमध्येही १४, ७४० उद्दिष्टांच्या तुलनेत २९, ५५१ महिलांना योजनेचा लाभ‎ मिळवून दिला. सुरुवातीला १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याची‎ नियमित परतफेड केल्यास आणखी कर्ज दिले जाते. त्यामुळे ज्या उद्दिष्टांसाठी कर्ज‎ घेतले त्यावरच ते खर्च करावे, असे यांनी डाॅ. कराड आवाहन केले.‎

बातम्या आणखी आहेत...