आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून तिघांची आत्महत्या‎:'मी चाललो,' असे सोशल मीडियावर लिहून गेवराईच्या व्यावसायिकाने संपवले जीवन‎

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या २४ तासांत सुराणानगर, किराडपुरा‎ आणि अंगुरीबाग परिसरातील तिघांनी कौटुंबिक‎ वादातून आपले जीवन संपवल्याची घटना घडली.‎ याप्रकरणी संबंधित ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद‎ करण्यात आली.‎ गेवराईच्या व्यावसायिकाने साेलापूर-धुळे‎ महामार्गाजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या‎ केली.

विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल‎ मीडियावर मी चाललो, अशी पोस्ट आत्महत्या करत‎ असल्याचे सांगितले. त्यानंतर टोकाचे पाऊल‎ उचलले. चेतन रविंद्र जैस्वाल (४२) असे त्यांचे नाव‎ आहे. चेतन मूळ गेवराईचे असून त्यांचा मद्यविक्रीसह‎ हॉटेल व्यवसाय आहे. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते‎ पत्नीसह काही महिन्यांपासून सुराणानगरात राहत‎ होते. ते रागाच्या भरात निघून गेले होते. त्याच्या काही‎ तासांनंतर त्यांनी सोशल मीडियावर मी चाललो,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अशी पोस्ट करत मोबाइल बंद केला. त्यानंतर‎ त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही.

४‎ एप्रिल रोजी सकाळी सोलापूर-धुळे महामार्गावरील‎ तलवानी शाळेसमोर छोट्या तलावाजवळ लिंबाच्या‎ झाडाला पुरुष लटकल्याची माहिती एमआयडीसी‎ वाळूज पोलिसांना मिळाली. अंमलदार पंढरीनाथ‎ साबळे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. तेव्हा‎ चौकशीत जैस्वाल यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न‎ झाले.‎ दुसऱ्या घटनेत किराडपुऱ्यातील जोहेब खान रऊफ‎ खान (२२) याने रागाच्या भरात १ एप्रिल रोजी रात्री‎ विषारी औषध केले होते.

मात्र, त्याचा घाटीत‎ मंगळवारी मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस‎ तपास करीत आहेत.‎ २७ वर्षीय कामगाराचा गळफास‎ तिसऱ्या घटनेत अंगुरीबाग येथील २७ वर्षीय अजीम‎ नजीर शेख याने मंगळवारी पहाटे ५ वाजता‎ आत्महत्या केली. तो मोंढ्यात काम करत होता. काही‎ दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी गेली होती.‎ मंगळवारी सकाळी तो त्याच्या खोलीत लटकलेल्या‎ अवस्थेत आढळला. याप्रकरणी सिटी चौक ठाण्याचे‎ सहायक फौजदार देविदास तुपे तपास करीत आहेत.