आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

99 एकरांचा परिसर:अतिक्रमणांच्या विळख्यातून सुटणार ‘घाटी’,‎ 1.5 किमी भिंतीसाठी खर्च करणार 2.5 कोटी‎

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयाला (घाटी) अतिक्रमणांचा‎ विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा‎ परिसर संरक्षित करण्यासाठी भूमी‎ अभिलेख विभागाकडून घाटीच्या‎ मालकीच्या जागेची मोजणी करण्यात येत‎ आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण‎ होईल. त्यानंतर घाटीत सुमारे दीड‎ किलोमीटर संरक्षक भिंत बांधण्यासाठीचा‎ मार्ग मोेकळा होणार आहे. त्याचबरोबर‎ अतिक्रमित जागादेखील घाटीला परत‎ मिळणार आहे.‎ घाटीच्या आजूबाजूच्या परिसरात‎ अनेक अतिक्रमणे आहेत. त्यामुळे त्याचा‎ फटका घाटीच्या परिसरालाही बसतो.‎ त्यामुळे घाटी प्रशासनाने संरक्षक भिंतीचा‎ प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी अडीच‎ कोटी रुपयांचा निधी मंजूरदेखील करण्यात‎ आला होता. त्यामधून या भिंतीचे बांधकाम‎ केले जाणार आहे.‎ घाटीचा परिसर ९९ एकरांचा :‎ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयाचा परिसर सुमारे ९९ एकरांचा‎ आहे. ‘घाटी’ची स्थापना १५ अाॅगस्ट १९५६‎ रोजी झाली. सुरुवातीला छावणीतील‎ निजाम बंगला येथे महाविद्यालय सुरू‎ करण्यात आले. त्या वेळी नेत्ररोग,‎ संसर्गजन्य आजार आणि प्रसूतिशास्त्र हे‎ विभाग आमखास मैदान येथील इमारतीत‎ होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव‎ चव्हाण आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी‎ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते २७‎ अाॅक्टोबर १९५७ रोजी घाटीच्या इमारतीचे‎ भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन‎ केंद्रीय आरोग्यमंत्री सुशीला नय्यर यांच्या‎ हस्ते २० जून १९६४ रोजी घाटीच्या‎ इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या‎ ठिकाणी सुमारे ९९ एकरांवर रुग्णालय व‎ महाविद्यालयाच्या ३० विविध इमारतींची‎ उभारणी करण्यात आली.‎‎

आठवडाभरात होणार मोजणी‎ घाटीच्या संरक्षक भिंतीचीही मोजणी सुरू करण्यात आली आहे. शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, ‘सुपर स्पेशालिटी’चे‎ विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी, अभ्यागत समिती सदस्य इक्बालसिंग‎ गिल यांच्यासह इतर समिती सदस्यदेखील उपस्थित होते. आठवडाभरात‎ मोजणीचे हे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले‎ जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले‎

मोजणीनंतर कळेल‎ अतिक्रमणांची स्थिती‎
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे‎ उपअभियंता के. एम. आय. सय्यद यांनी‎ सांगितले की, घाटीची संरक्षक भिंत‎ २,९००मीटर लांबीची आहे. सध्या सुमारे‎ १,४०० मीटरच्या संरक्षक भिंतीचे‎ बांधकाम करण्यात येणार आहे. काही‎ ठिकाणी पूर्वीची भिंत सुस्थितीत आहे.‎ तेथे नवी भिंत बांधण्यात येणार नाही.‎ केवळ पडलेली भिंत नव्याने उभारली‎ जाईल. त्याचबरोबर या मोजणीमुळे‎ घाटीच्या किती जागेवर अतिक्रमणे‎ केलेली आहेत, हे देखील कळेल.‎ त्यामुळे संरक्षक भिंत बांधताना‎ अडचणी येणार नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...