आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचा पाणीपुरवठा वाढण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. २० मेपर्यंत १० एमएलडी पाणीपुरवठा वाढेल असे नियाेजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात गुरुवारी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
हर्सूल तलावातून सहा एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन आहे. याशिवाय विद्यमान पाणीपुरवठा योजनेमध्ये सुधारणा करून जायकवाडीहून येणाऱ्या पाण्यात सहा एमएलडी वाढ करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सिडको एन-७ आणि एन-५ टाक्यावरचे टँकर पॉइंट बंद करणे आणि एमआयडीसी एन-१ येथे टँकर पॉइंट सुरू करण्यात आल्यामुळे दोन एमएलडी वाचवता येईल, असेही सांगण्यात आले. बैठकीस शहर अभियंता सखाराम पानझडे, संतोष टेंगळे, उपायुक्त, अपर्णा थेटे, उपायुक्त हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता अजय सिंग, एस. ए. खान, डी. के. पंडित, किरण धांडे, अशोक पद्मे, अरुण मोरे, मनोज बाविस्कर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोड, फैज अली उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.