आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत 4 अंशांनी कमी:अतिशीत वाऱ्यांमुळे राज्यभरात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत आठवड्यातील दमट व उष्ण वातावरणाने उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणले आहे. परिणामी शुक्रवारी किमान तापमान ९.६, तर शनिवारी ९.१ अंश सेल्सियसवर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी नीचांक पातळीवर जाण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. आता २ दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

गत आठवड्यात कमी हवेचा दाब वाढल्याने किमान तापमान वाढले होते. थंडीचा कडाका कमी झाला होता. दमट उष्णतेमुळे पश्चिमी विक्षोभ व उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरले. हवेचा वेग वाढून रात्रीचे तापमान वेगात कमी झाले. १ फेब्रुवारी रोजी १४.२ अंशांवर असलेले किमान तापमान गत दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा चार अंशांपर्यंत घसरले आहे. अंग गोठवणारी थंडी दाखल झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...