आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच "चकवा''‎:जालना-जळगावचा ट्रॅक ऐनवेळी खामगावकडे‎ वळवला

‎ ‎ छत्रपती संभाजीनगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दानवेंचा जोर जळगाव‎ मार्गासाठी; अर्थसंकल्पात‎ घोषणा खामगाव मार्गाची‎ झाल्याने सर्वच चकित‎

जालना जळगाव रेल्वेमार्ग व्हावा यासाठी केंद्रीय‎ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण शक्ती‎ पणाला लावली. त्यांनी या मार्गाचे विक्रमी वेळेत‎ सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. पण राज्याच्या अर्थसं‎ कल्पात या मार्गाऐवजी जालना- खामगाव या ११३‎ वर्षे जुनी मागणी असलेल्या मार्गासाठी राज्य‎ सरकारने हिस्सा देण्याची घोषणा करून एक प्रकार‎ मंत्री दानवेंनाच //"चकवा'' दिल्याची चर्चा राजकीय‎ वर्तुळात हाेत आहे.

दुसरीकडे, बुलडाणा आणि‎ विदर्भाशी कनेक्ट व्हीटी वाढवण्यासाठी‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याने‎ खामगाव मार्गाची घोषणा झाली.‎ जालन्याहून जळगाव आणि तेथून पुढे थेट मध्य‎ प्रदेशला जाण्याचा मार्ग सुलभ होणार असल्याने‎ जालनेक ांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्या‎ फाेल ठरल्या. दानवे यांच्याकडे रेल्वेमं ्रिपदाची‎ जबाबदारी येताच त्यांनी जालना- खामगाव आणि‎ जालना जळगाव या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करून‎ घेतले होते. जालना- खामगाव या मार्गाचे यापूर्वीही‎ अनेक वेळा सर्वेक्षण झाले. मात्र हा मार्ग‎ परवडणारा नसल्याचा अहवाल येत असल्याने‎ त्याचे काम पुढे सरकले नाही. दुसरीकडे जालना‎ जळगाव या रेल्वेमा र्गासाठी स्वत: रावसाहेब दानवे‎ आग्रही आहेत. रेल्वे विभागातील सूत्रांनी दिलेल्या‎ माहिती नुसार, या मार्गासाठी जवळपास सहा हजार‎ कोटी रुपये आवश्यक आहेत. सध्या हा प्रस्ताव‎ रेल्वे बोर्डाकडे आहे. रेल्वे बाेर्ड यासंदर्भात‎ आवश्यक ती कार्यवाही करून याचा अहवाल‎ नीती आयोगाकडे जाणार आहे. नीती आयोगाने‎ होकार दिल्यानंतर कोणताही अडसर राहणार नाही.‎ दरम्यान, जालना- खामगाव या मार्गाची जालना‎ जिल्ह्यातील लांबी १२ कि.मी.आहे.‎

विदर्भाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आग्रही‎
ब्रिटिशांनी सुरू केले काम‎ खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातील‎ कापूस, इतर कच्चा माल जालना‎ स्थानकाहून थेट इंग्लंडला घेऊन जाता‎ यावा यासाठी ब्रिटिश सरकारने १९१०‎ च्या सुमारास जालना-खामगाव असा‎ रेल्वेमार्ग प्रस्तावित केला होता. १९२९‎ मध्ये या मार्गाचे काम सुरू झाले. सेंट‎ पेनेन्झुला कंपनीला याचे कंत्राट देण्यात‎ आले. चार वर्षे काम चालले.‎ दरम्यानच्या काळात दुसरे महायुद्ध सुुरू‎ झाले. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा‎ निर्णायक लढा सुरू झाला आणि‎ ब्रिटिशांनी पळ काढला.‎

खामगाव मार्गावर भराव‎ जालना-खामगाव मार्गावर रेल्वे‎ रूळ टाकण्यासाठी १९२९ मध्ये तयार‎ केलेले मातीचे भराव अजूनही दिसून‎ येतात. काही ठिकाणी रेल्वे रुळाचे‎ साहित्य टाकण्यात आले होते.‎ ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या मार्गाचे‎ काम तेव्हा चार वर्षांतच बंद पडले.‎ २००२ मध्ये या कामाचे सर्वेक्षण‎ करण्यात आले तेव्हा या मार्गासाठी‎ २६ हजार कोटी रुपये अपेक्षित होते.‎ मात्र त्यानंतर या प्रकल्प बासनातच‎ राहिला. आता प्रकल्पाची किंमत‎ वाढू शकते.‎

मामा चौकात फटाके फोडून रेल्वे संघर्ष समितीने जल्लोष केला.‎
जळगाव मार्गाचा विक्रमी वेळेत सर्व्हे‎ जून २०२१ मध्ये रेल्वेमंत्री होताच काही दिवसांतच दानवेंनी या १४०‎ किमी रेल्वेमार्गाची घोषणा केली. सर्व्हेसाठी साडेचार कोटी मंजूर‎ केले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२२ रोजी फायनल लोेकेशन सर्व्हे, १४ ते‎ १८ मे २०२२ या कालावधीत रडारद्वारे सर्व्हे केला.‎

बातम्या आणखी आहेत...