आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री समर्थ रामदास नवमीनिमित्त एन-२ मायानगर येथे सोमवारपासून (६ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मायानगर येथील अभिनव मारुती मंदिर येथे ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत दासबोधाचे पारायण, सायंकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी किरण जोशी यांच्या कीर्तनाने दासनवमीच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. १५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रवचन आणि दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.