आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि कोकणात रत्नागिरी जिल्ह्यास मंगळवारी पावसाने जोरदार दणका दिला. नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांना पावसाचा जबर तडाखा बसला असून नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर, बीड जिल्ह्यातील पाझर तलाव फुटले असून मराठवाड्यात विविध ठिकाणी ९ , विदर्भात ९ आणि खान्देशात २ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
राज्याच्या इतर भागातही जोरदार पाऊस सुरू अाहे. कोकणात चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. तर मंगळवारी दुपारपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये तब्बल ६० मिमी पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात स्थिती गंभीर
मराठवाड्यात पावसाची स्थिती गंभीर झाली आहे. गोदावरीसह सर्वच प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लातूर, बीड जिल्ह्यातील पाझर तलाव फुटले असून विविध ठिकाणी १० जण वाहून गेले आहेत. नांदेड, हिंगाेली, परभणी, बीड, लातूर अादी जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झाेडपून काढले.
हिंगोली जिल्ह्यात दोघे वाहून गेले. एका अनोळखीचा मृतदेह आढळला. परभणी जिल्ह्यात एक जण वाहून गेला असून शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. बीड जिल्ह्यातही धरणे ओव्हरफ्लो झाली असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धबधबा पाहायला गेलेला एक वाहून गेला तर एकाला वाचवले आहे. गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे मारफळा, भेंड खुर्द, भेंड बुद्रुक व जातेगाव येथील ४ प्रकल्प फुटले.
आैरंगाबाद : घरे, दुकानांत पाणी, दिवसभरात १२७ मिमी पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच औरंगाबादेत मंगळवारी सायंकाळी पावसाचे ढगफुटीसारखे राैद्ररूप दिसून आले. सायंकाळी मात्र ७.१० ते ८.१० या तासाभरात मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा प्रचंड वेगाने पाऊस झाला. यात पहिल्या ३० मिनिटांत ताशी १६६.७५ मिमी वेगाने ५६.२ मिमी पाऊस पडला, तर रात्री ८.३० पर्यंत १२७.५ मिमीची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. यंदाच्या मोसमातील हा पहिला जाेरदार पाऊस हाेता. अतिवृष्टी झाल्याने १०० पेक्षा अधिक वसाहतींतील घरांत, पैठण गेटसह प्रमुख बाजारपेठांतील दुकानांत पाणी शिरले. अग्निशमन विभागाला ८० काॅल आले. त्यांचे पाच बंब व जवानही उशिरापर्यंत मदतकार्यात व्यग्र हाेते.सविस्तर.
मराठवाडा : नांदेड जिल्ह्यात माजी आमदार राठोड यांचे पुत्र व नातू कारसह गेले वाहून नांदेडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. कौठा रस्त्याने मुखेडकडे येत असताना दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून कारने (एमएच २० डीजे ६९२५) मुखेडकडे येत असताना माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदीप राठोड कारसह वाहून गेले. नाल्यावरून कार खाली पडली आणि बुडाली. यात पिता-पुत्र बेपत्ता असून त्यांचा सेवक उद्धव देवकते झाडावर बसल्याने बचावला आहे. दरम्यान, वाहून गेलेली कार नंतर सापडली, मात्र पिता-पुत्रांचा अद्याप शोध सुरू आहे.
का होतोय एवढा पाऊस ? छत्तीसगड परिसरावर चक्रीय चक्रवात स्थिती
हर्सुल तलाव ओव्हरफ्लो, रात्री एक वाजता सांडव्यातून पाणी, खामनदी पात्रात...।
मंगळावारी औरंगाबाद शहरात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. या ढगफुटीसदृश पावसामुळे हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर रात्री एक वाजता सांडवयातून पाणी, खामनदी पात्रात वाहत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.