आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी शनिवारी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दरम्यान, माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणामधील शेतकरी संपन्न आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनादेखील तेलंगणासारखे सुखी व समाधानाचे जीवन जगता आले तर खूप बरे होईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. या वेळी आमदार बालका सुमन, भारत राष्ट्र समितीच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.