आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्न, वस्त्र, निवारा या तर भौतिक व शारीरिक गरजा आहेत, पण माणसाला जगवतो तो विचार. जे पोट हातावर धरून जगतात ते पोटवळीक असतात, जे विचारावर जगतात ते माणूस म्हणून जगतात. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीच बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन आहे, असे मत संमेलनाध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई शहरात शनिवारी राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने उत्साहात सुरुवात झाली. ग्रंथदिंडीत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. तालुक्यातील जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित धानोरा बुद्रुक, ता. अंबाजोगाईच्या वतीने दोनदिवसीय राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ज्येष्ठ साहित्यिक संतराम कराड यांनी संविधान वाचन केले. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वि. दा. सावरकर चौक - मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. शहरातील मुकुंदराज सभागृहात संमेलनाचे उद्घाटन प्रकाश महाराज बोधले, संमेलनाध्यक्ष अण्णाराव पाटील, प्रमुख पाहुणे माजी मंत्री पंडितराव दौंड, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब, वसंतराव मोरे, उद्धव बापू आपेगावकर, आयोजक मनीषा विद्याधर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. जोशींना काव्यगौरव पुरस्कार संमेलनात शरद प्रतिभा शेतकरी साहित्य गौरव पुरस्काराने विश्वंभर विराट, काव्य गौरव पुरस्काराने दिनकर जोशी, नाट्यगौरव पुरस्काराने डॉ. सिद्धार्थ तावडे, तर आरोग्यसेवा पुरस्काराने डॉ. लक्ष्मणराव पन्हाळे, डॉ. दीपक फुटाणे, लघुउद्योजक गौरव पुरस्काराने बप्पासाहेब डावकर, समाजसेवा गौरव पुरस्काराने यमुनाबाई सोनवणे, सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने शकिला बानू शब्बीर शेख, प्रफुल्ल शशिकांत, सूक्ष्म उद्योग गौरव पुरस्काराने सुरेखा बंग, उर्दू शिक्षण गौरव पुरस्काराने मुजीब काजी, योगेश्वरी पायसेस, विश्वंभर ठोंबरे यांना तर कोरोना योद्धा पुरस्काराने अनंत वेडे यांना देण्यात आला. दुर्बल घटक कार्य गौरव पुरस्काराने तोरण सिंग तारासिंग टाक यांना सन्मानित करण्यात आले.
अंबाजोगाईचे प्रश्न संमेलनातून समोर आले
बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन घडवायचे आहे. सामान्य जनतेचे प्रश्न आता साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून मांडायचे अाहे. साठवण तलाव यासारखे प्रश्न पुन्हा एकदा बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरून समोर आले. - असिफोद्दीन खतीब, स्वागताध्यक्ष, बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.