आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात ६७ लाख पेन्शनधारक आहेत, त्यापैकी १३ लाखांहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ईपीएस-९५ पेन्शनधारकांना ७५०० रुपये पेन्शन तसेच महागाई भत्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (१५ मार्च) क्रांती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर यांनी दिली. आंदोलनात पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कमलाकर पांगारकर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.