आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी तरतूद केली आहे. मराठवाड्याच्या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण काही अपवाद वगळता निधीच्या प्रत्यक्ष तरतुदीबद्दल स्पष्ट उल्लेख यात केलेला दिसत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पात छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ७३४ कोटी निधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र व परिसर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर या मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विकासकामे मार्गी लागण्यासाठी फायदा होऊ शकतो. याशिवाय बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या संवर्धन व विकासासाठी २५ कोटी, सोलापूर-तुळजापूर-धार ाशिव या ८४ किमीच्या नवीन ब्रॉडगेजसाठी राज्याचा ४५२ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. जालना-खामगाव रेल्वेमार्गासाठीही राज्याचा हिस्सा दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजला ५० कोटींतून नवे क्रीडा विद्यापीठ करण्याची घोषणा केली आहे.
या क्षेत्रासाठी घोषणा, पण निधीचा उल्लेख नाही मराठवाडा वॉटरग्रीड निर्माण करण्याची घोषणा. "हर घर जल'' योजनेंतर्गत वाॅटरग्रीडचा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवला.नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग होणार. यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही शक्तिपीठे आणि औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, नांदेडचा गुरुद्वारा या मार्गाद्वारे जोडणार असल्याचा उल्लेख. प्रत्यक्ष तरतुदीचा उल्लेख नाही.सीमावर्ती भागातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षणासाठी सर्वंकष कार्यक्रम तयार करण्यात येणार.धाराशिव, परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम करणार. निधीबद्दल काहीही उल्लेख नाही.
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकासासाठी आवश्यक निधी देणार.नांदेड येथे वीर बाल दिन महोत्सव करणार. पण निधीचा आराखडा नाही.जालना-बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर जाळीचा देव तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव तरतूद.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, शूलिभंजन विकास आराखड्याला निधी.ख्यातकीर्त विचारवंत, साक्षेपी समीक्षक कै.नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकास आवश्यक निधी देणार.मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यास निधी देणार. गत अर्थसंकल्पात अजित पवार यांनी यासाठी ७५ कोटींचा निधी दिला होता.
मराठवाड्याबाबत नेहमीच दुजाभाव
राज्याच्या अर्थसंकल्पात यापूर्वीही अनेक आश्वासने देण्यात आली होती. वैधानिकविकास मंडळाच्या बाबतीतही दोन वर्षांपूर्वी आश्वासित केले होते.परंतु त्याची पूर्तता काही केली नाही. यंदाही घोषणा मोठ्या करण्यातआल्या. परंतु त्यावर विश्वास किती ठेवावा हाही प्रश्नच आहे.राज्याच्या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या वाट्याला फारसे काहीआले असे वाटत नाही. नेहमीच दुजाभाव केल्याचे दिसून येते.- माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, अध्यक्ष, मराठवाडा जनताविकास परिषद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.