आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा हसला अन् कापूस रुसला!‎:कांद्याला 300 रुपये मदत दिली, कापसाला 2 हजार बोनस द्या‎, शेतकरी संघटनांची मागणी

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कांदा ७.८७ लाख हेक्टरवर‎ असूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची‎ व्यथा विधिमंडळात पोहोचली.‎ त्यांच्यासाठी अनुदान जाहीर झाले.‎ मात्र, त्याहून अधिक म्हणजे ४२ लाख‎ हेक्टरवर असलेल्या कापसाच्या पदरी‎ अजूनही निराशा आली आहे.‎ कापसाचे भाव पडल्यामुळे‎ शेतकऱ्यांनी ७० टक्के कापूस घरातच‎ ठेवला आहे. यंदा मराठवाड्यात‎ दीडशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या‎ झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने‎ नुकसान झालेल्या धानाला, कांद्याला‎ केलेल्या मदतीप्रमाणे कापूस उत्पादक‎ शेतकऱ्यांनाही किमान प्रतिक्विंटल‎ दोन हजार रुपये बोनस द्यावा अशी‎ मागणी करण्यात येत आहे. विशेष‎ कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने‎ मराठवाड्यातील नेतेही गप्प आहेत‎ आणि सरकारही चुप्प.‎ मराठवाडा आणि विदर्भात कापूस‎ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या‎ प्रमाणात आहे. मराठवाड्यात‎ साडेबारा लाख हेक्टरवर पांढरे सोने‎ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या‎ कापसाची लागवड आहे. कापसाच्या‎ पडलेल्या भावामुळंे शेतकऱ्यांची‎ आर्थिक कोंडी होत असून कापूस‎ साठवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना‎ किडे चावून त्वचेचे आजार होत‎ आहेत.‎ कापूस एकाधिकार योजनेत‎ कापसाला ५०० रुपये बोनस देऊन‎ खरेदी केली जात होती. माजी‎ मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि‎ मनोहर जोशी यांच्या काळात हा‎ बोनस देण्यात आला होता. त्याच‎ धर्तीवर कापसाला बोनस देण्याची‎ गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञ विजय‎ जावंधिया यांनी व्यक्त केले. कापूस हे‎ कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक आहे.‎ त्यामुळे कोरडवाह़ू शेतकरी खरिपात‎ हे पीक घेतल्यानंतर त्यावरच‎ उदरनिर्वाह करतो. मात्र कापसाला‎ भाव मिळत नसल्यामुळे राज्यात‎ सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या‎ या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्याच‎ होत आहेत.‎

किमान एक हजार‎ रुपये बोनस द्या‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान‎ सरकारच्या धोरणामुळे झाले‎ आहे. त्यामुळे किमान एक‎ हजार बोनस कापसाला‎ प्रतिक्विंटल द्यायला हवा.‎ लोकप्रतिनिधी कापसावर‎ बोलत नसल्यामुळे‎ शेतकऱ्यांना त्याच्या‎ तालुक्यातील आमदारांना‎ कापसावर काय बोलले याचा‎ जाब विचारायला हवा.‎ - अनिल घनवट, अध्यक्ष,‎ स्वतंत्र भारत पक्ष‎ कापूस उत्पादकांनी‎ काय पाप केले?‎ सरकारने धान-कांदा‎ उत्पादक शेतकऱ्यांना मदत‎ केली, मग कापूस‎ उत्पादकांनी काय पाप‎ केले? बारा हजार रुपये‎ क्विंटल असलेला कापूस‎ सात हजारांवर आला आहे.‎ त्यामुळे पाच हजार रुपये‎ प्रतिक्विंटल मदत‎ शेतकऱ्यांना मिळायला‎ हवी.‎ - कल्याण काळे,‎ जिल्हाध्यक्ष, काँग्रेस‎

किमान दोन हजार रुपये बोनस द्या‎ कापूस एकाधिकार योजनेत जसा बोनस दिला जात होता‎ तसा क्विंटलमागे दोन हजार रुपये बोनस देण्याची गरज आहे.‎ तरच शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान भरून निघेल.‎ - विजय जावंधिया , कृषी अभ्यासक‎ किमान दोन हजार रुपये बोनस द्या‎ कापूस एकाधिकार योजनेत जसा बोनस दिला जात होता‎ तसा क्विंटलमागे दोन हजार रुपये बोनस देण्याची गरज आहे.‎ तरच शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान भरून निघेल.‎ - विजय जावंधिया , कृषी अभ्यासक‎ किमान एक हजार‎ रुपये बोनस द्या‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान‎ सरकारच्या धोरणामुळे झाले‎ आहे. त्यामुळे किमान एक‎ हजार बोनस कापसाला‎ प्रतिक्विंटल द्यायला हवा.‎ लोकप्रतिनिधी कापसावर‎ बोलत नसल्यामुळे‎ शेतकऱ्यांना त्याच्या‎ तालुक्यातील आमदारांना‎ कापसावर काय बोलले याचा‎ जाब विचारायला हवा.‎ - अनिल घनवट, अध्यक्ष,‎ स्वतंत्र भारत पक्ष‎

कापूस उत्पादकांनी‎ काय पाप केले?‎ सरकारने धान-कांदा‎ उत्पादक शेतकऱ्यांना मदत‎ केली, मग कापूस‎ उत्पादकांनी काय पाप‎ केले? बारा हजार रुपये‎ क्विंटल असलेला कापूस‎ सात हजारांवर आला आहे.‎ त्यामुळे पाच हजार रुपये‎ प्रतिक्विंटल मदत‎ शेतकऱ्यांना मिळायला‎ हवी.‎ - कल्याण काळे,‎ जिल्हाध्यक्ष, काँग्रेस‎

मराठवाड्यात १५० वर शेतकरी आत्महत्या‎ हमीभाव आणि वाढता‎ उत्पादन खर्च अडचण‎ कापसाचा हमीभाव ६३००‎ इतका आहे. कापसाचा भाव‎ डिसेंबर २०२२ अखेर ९६००‎ रुपये प्रतिक्विंटल इतका होता,‎ तर २०२१ मध्ये कापसाचा भाव‎ बारा हजार इतका गेला होता.‎ त्यामुळे या वर्षीच्या हंगामात‎ ९६०० पेक्षा अधिक भाव मिळेल‎ यामुळे शेतकऱ्यांनी कापूस‎ साठवून ठेवला होता. मात्र‎ कापसाचे भाव सातत्याने‎ कोसळत असून ७६००‎ प्रतिक्विंटल अशी स्थिती सध्या‎ आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच‎ दोन हजार रुपयांनी कापसाचे‎ भाव कोसळले आहेत. कापूस‎ आयात केल्यामुळे देशातील‎ भाव पडल्याचा आरोप केला‎ जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...