आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:स्वावलंबन, आत्मनिर्भरता हा गांधी विचारांचा पाया, तो विद्यार्थ्यांनी अंगीकारावा : चेलादुराई

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रत्येक कृतीमागे विचार तर विचारामागे निश्चित सूत्र होते. स्वावलंबन, स्वयंशिस्त व आत्मनिर्भरता ही गांधी विचारांची पायाभूत त्रिसूत्री होती. विद्यार्थ्यांनी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे मत गांधीवादाचे अभ्यासक तथा एमजीएमचे डॉ. जॉन चेलादुराई यांची केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात गांधीयन अभ्यासावर त्यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. विभागाचे संचालक डॉ. फारूक खान अध्यक्षस्थानी होते.

डॉ. जॉन चेल्लादुराई म्हणाले, ब्रिटिश राजवटीत भारतीय कापड कामगारांचे शोषण आणि दु:ख स्पष्ट करताना त्यांनी भारतीय वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनात महात्मा गांधींच्या भूमिकेवर विशेष भर दिला. सर्वात नम्र आणि गरिबीने पिचलेल्या भारतीयाला आपण मोठ्या गोष्टीत सहभागी होऊ शकतो, असे वाटण्याचे श्रेय गांधींना जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जन आणि लोककेंद्रित चळवळीत रूपांतरित करण्याचे श्रेय गांधींना जाते. पूर्वी ते फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित इंग्रजी भाषिक लोकांच्या छोट्या वर्गापुरते मर्यादित होते. डॉ. खान म्हणाले, ‘गांधीवादी विचारसरणीच्या अंतर्दृष्टीशिवाय आधुनिक भारताचा इतिहास समजून घेणे कठीण आहे.’ डॉ. अभिजित शेळके, डॉ. रोला कृष्णा प्रिया, डॉ. सोनाली क्षीरसागर, डॉ.कावेरी लाड, डॉ.सतीश भालशंकर उपस्थित होते.

समाज घडवण्यासाठी विधायक भूमिका बजावावी डॉ. चेलादुराई म्हणाले, ‘समाज घडवण्यासाठी व्यक्तीने विधायक भूमिका बजावली पाहिजे हे समाजकल्याणाचे गांधीवादी तत्त्व आहे. सामाजिक मुक्ती, आर्थिक सबलीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्म, भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या अनेक ओळखींना कापून एकतेच्या सामायिक भावनेशिवाय भारताला खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही, अशी गांधींची खात्री होती.

बातम्या आणखी आहेत...