आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला १५ टक्के पेक्षाही कमी जागा मिळतील तर पुढील लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून शिवसेनेचाच खासदार विजयी होणार असा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोलीत मंगळवारी ता. 12 पत्रकार परिषदेत केला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ते हिंगोलीत आले होते. यावेळी आमदार संतोष बांगर, शिवसेनेचे पदाधिकारी राम कदम उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी गावपातळीवर जात आहे. त्यातून गावातील समस्या जाणून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात जास्त ठिकाणी भाजपा दावा करीत आहे यावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही भाजपने सर्व सहा जागांवर विजय मिळविण्याचा दावा केला होता. मात्र त्यांना केवळ एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे दावे किती विश्वासाचे आहेत हे स्पष्ट होते. राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या 15 टक्के ग्रामपंयतीही त्यांना जिंकता येणार नाहीत. या निवडणुकीच्या मतमोजणी नंतर निवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्या व्यासपीठावर सत्कार केला जाईल. त्यावेळी शिवसेनेला किती ग्रामपंचायती मिळविता आल्या हे स्पष्ट पणे दिसून येईल असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराबाबत काय म्हणाले सत्तार
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराबाबत ते म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मित्र पक्षांशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेतीलच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे हि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.