आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यामुळे औरंगाबाद तसेच जळगाव-विदर्भातील आठ गावांना जोडणारी एसटी बससेवा सुरू झाली. यामुळे औरंगाबादकरांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा परिषदेतर्फे करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिडको आगारातून सिल्लोडमार्गे बुलडाणा, जळगाव, मलकापूर, भुसावळ, रावेर, यावल, सोयगाव, सिल्लोड बससेवा सुरू करण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वात विभागीय वाहतूक अधिकारी अ. व. अहिरे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार २ डिसेंबरपासून दररोज सकाळी ७ वाजता सिडको बसस्थानकातून सेवा सुरू झाली. यामुळे सिडको-हडको, चिकलठाणा, शिवाजीनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी बससेवा सुरू होताना परिषदेचे शहर कार्याध्यक्ष गणेश काळे, साळुबा पांडव, अनिल चौधरी, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख संदीप घोडके आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.