आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायरान धारकावर करण्यात येत असलेली कारवाई थांबवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसील कार्यालयासमोर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये गायरानधारकावरील अतिक्रमण काढल्यानंतर नागरिकांना बेघर व्हावे लागणार असल्याने हजारो नागरिक बेघर होणार असल्याने शासनाने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई अतिक्रमणधारकांवर करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या वेळी रामनाथ शिराळे, गोरखनाथ शिंदे, रंजनाबाई म्हस्के आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.