आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Student Aadhar Updation Aurangabad Newsजिल्ह्यात अद्यापही 43 हजार‎ 820 विद्यार्थी "आधार'' विनाच‎

आधार अनिवार्य:जिल्ह्यात अद्यापही 43 हजार‎ 820 विद्यार्थी "आधार'' विनाच‎

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर‎ शिक्षण विभागाने शाळांची संच मान्यता‎ आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय‎ सुविधांसाठी ३० एप्रिलपर्यंत स्टुडंट्स‎ पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे‎ अनिवार्य केले आहे. मात्र, अद्यापही ४३,८२०‎ विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदवलेली‎ नाही, अशी माहिती वरिष्ठ‎ शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.‎

आधार नोंदणी अनिवार्य

शासनाकडून विद्यार्थी संख्येनुसार संच‎ मान्यता करण्यात येते. मात्र, काही शाळांनी‎ बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षकांची पदे‎ भरल्याचे समोर आल्याने शासनमान्य सर्व‎ शाळांना विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अनिवार्य‎ केली आहे. त्यानुसार शाळांमध्ये संच मान्यता‎ करण्यात येणार आहे.

त्यासाठी पहिली ते‎ बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार‎ माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवण्याचे आदेश‎ दिले होते.‎ विभागातील सुमारे २५ लाख ८,३३८‎ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या सर्व‎ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी स्टुडंट पोर्टलवर‎ करणे शाळांना बंधनकारक केले आहे.‎ त्यानंतरही छत्रपती संभाजीनगर, जालना,‎ बीड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील‎ सुमारे ४३,८२० विद्यार्थ्यांची आधार अपडेट‎ केले नाही.

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे स्थलांतर
शासन धोरणानुसार‎ किमान २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी‎ आकडेमोड केल्यास विभागातील किमान‎ २,१९१ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता‎ वर्तवण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या‎ सुट्यांमुळे अनेक विद्यार्थी पालकांबरोबर‎ स्थलांतरित, तर काही परगावी गेले आहेत.‎ त्यांचे आधार कार्ड उपलब्ध होत नसल्याने‎ अपडेटचे काम रखडले आहे. त्यासाठी‎ शिक्षण विभागाने शाळांना मुदतवाढ देणे‎ आवश्यक आहे.‎