आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने सुरू झाली आहे. या अनुषंगाने आता राज्य मंडळाने उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचे असून उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे कोणतेही पान फाडू नये. पर्यवेक्षकांकडून बारकोड स्टिकर मिळाल्यावर काळजीपूर्वक दिलेल्या जागेवर चिकटवावे, असे निर्देश दिले.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका लिहिण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पाठवल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी १०:३० वाजेपर्यंत, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी २:३० वाजेपर्यंत परीक्षा कक्षात पोहोचावे लागणार आहे.
गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. यंदा मात्र नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द केल्या आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे दोन वर्षांनंतर थेट दहावी, तर काही थेट बारावीचीच परीक्षा देणार असल्याने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनानंतर दोन वर्षांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स काही विद्यार्थी थेट दोन वर्षांनंतर दहावीच्या, तर काही बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणार आहेत. उत्तरपत्रिका लिहिताना नेमक्या काय चुका करू नयेत याची माहिती विद्यार्थ्याना असावी या उद्देशाने या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. मंडळाने त्यात काही नवे महत्त्वपूर्ण बदलही केले आहेत. - एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय
उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अशा आहेत सूचना परीक्षा दालनात परीक्षार्थीस पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती पत्रकावर क्रमांक, बारकोड स्टिकर लिहून स्वाक्षरी करावी. स्टिकर काळजीपूर्वक दिलेल्या जागेवरच चिकटवावे.
- परीक्षार्थीने उत्तराचा काही भाग खोडल्यास शिवाय त्यात शाईत बदल करावा लागला, कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या, काळ्या शाईने रेघ मारली असेल तर अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये.
उत्तरपत्रिका लिहिताना निळ्या अथवा काळ्या शाईचा वापर करावा, अन्यथा मजकुरास गुण दिले जाणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.