आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियोग्यता चाचणीचे अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचणी:अवघ्या 2 दिवसांचीच मुदत, उमेदवारांमध्ये गोंधळ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवसांची मुदत बाकी आहे. 8 फेब्रुवारी रोजी ही मुदत संपत आहे. परंतु संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता यामुळे अर्ज भरण्यात अडचणी येत असून, उमेदवारांचा गोंधळ उडत असल्याने शासनाने अडचणी सोडवून अर्जासाठी काय आवश्यक आहे. याची माहिती स्पष्ट करावी अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडण्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

अभियोग्यता चाचणीसाठीचे वेळापत्रक 31 जानेवारी रोजी जाहिर करण्यात आले. तर 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठीची मुदत देण्यात आली. परंतु परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रवर्गनिहाय माहिती देणे गरजेचे होते. शिवाय कॅफेवर अर्ज भरायला गेलेल्यावर अनेकांची माहिती अर्धवट भरली जाते आहे, चुका होत आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचे नाव दोन दोन तीन प्रवेश पत्र येऊन तो दोन तीन बॅचमध्ये परीक्षा देण्याची शक्यता आहे.

950 रुपये परीक्षा फी दोन वेळेला भरावी लागते आहे. तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढत असतात. परंतु सध्या उमेदवारांना परीक्षा अभ्यास सोडून कागदपत्रातील जुळवाजुळव करण्याकरिता धावळप करावी लागत असल्याचे असोसिएशनने शिक्षण आयुक्तांना दिलेल्या ईमेल निवेदनात म्हटले आहे. जवळपास साठ टक्के उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

''अभियोग्यता परीक्षांचा अर्ज भरत असताना उमेदवार गोंधळून गेलेले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा मानसिक आणि आर्थिक भुर्दंड भावी शिक्षकांना सहन करावा लागत आहे. परीक्षेसाठी अतिशय कमी वेळ दिलेला असून, परीक्षार्थींमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे.'' - संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष डीटीएड स्टुडण्ट असोसिएशन

बातम्या आणखी आहेत...