आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग रीब लोक जास्त कायदे मोडतात, म्हणजेच ते गुन्हेगार असतात, असे भारतातील तुरुंग दर्शवतात. एक नवीन धक्कादायक आकडेवारी दर्शवते की, कर्ज घेण्यामध्ये आणि परत करण्यात गरीब श्रीमंतांपेक्षा दुप्पट पुढे आहेत. मुद्रा कर्जामध्ये गेल्या सात वर्षांत सरकारने गरिबांना छोटी दुकाने आणि व्यवसायासाठी १३.६४ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यापैकी ९६.३% या गरिबांनी परत केले. २०१५ पासून मुद्रा योजनेंतर्गत मोबाइल दुरुस्ती, हातगाड्या चालवणाऱ्यांना उदरनिर्वाह चालवण्यासाठी हे कर्ज सुरू करण्यात आले. दुसरीकडे मंत्र्यांनी संसदेत सांगितले की, याच काळात बँकांचा एनपीए ६% पेक्षा जास्त वाढून ५.४० लाख कोटींवर गेला. बड्या उद्योगपतींना, उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज दिले जाते आणि ते जेव्हा ते भरण्यास असमर्थ असतात तेव्हा बँक अखेरीस ती नॉन परफॉर्मिंग अॅसेट मानते. मुद्रा कर्ज योजना सुरू झाली तेव्हा गरिबांकडून हे पैसे परत मिळणे कठीण होईल, असे मानले जात होते. पण, कदाचित नैतिकता आजही गरिबांचा दागिना आहे. यावरून स्पष्ट होते की, भारतीय तुरुंगांतील ९६% कैदी/कच्च्या कैद्यांत का गरीब आणि अशिक्षित आहेत? ते तेथे आहेत, कारण व्यवस्थेला क्षुल्लक गुन्ह्यांसाठी त्यांना पकडण्यात अधिक रस असतो, तर श्रीमंतांचे मोठे गुन्हे दुर्लक्षित केले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.