आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकाल:छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल‎ घसरला, चारही जिल्ह्यांत मुलींची बाजी, बीड दुसऱ्या स्थानी‎

छत्रपती संभाजीनगर‎3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च ‎ ‎ माध्यमिक शिक्षण मंडळाने‎ फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या ‎ ‎ बारावी परीक्षेचा छत्रपती संभाजीनगर ‎ ‎ विभागाचा सलग दुसऱ्या वर्षी निकाल ‎ ‎ घसरला असला तरी नेहमीप्रमाणे ‎ ‎ निकालात मुलींनीच बाजी मारली‎ आहे. विभागातून गेल्या वर्षीप्रमाणे‎ यंदाही छत्रपती संभाजीनगरने अव्वल ‎ ‎ स्थान राखले असून बीडने दुसरे आणि ‎ ‎ जालन्याने तिसरे स्थान कायम राखले. ‎ ‎ परभणी आणि हिंगोली गेल्या‎ वर्षीप्रमाणे पिछाडीवर राहिले

मंडळाने‎ बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी‎ (२५ मे) दुपारी जाहीर केला. छत्रपती ‎ ‎ संभाजीनगर विभागातून १ लाख ६४‎ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले‎ होते. यापैकी १ लाख ५१ हजार १४८‎ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.‎ विभागाचा निकाल ९१.८५ टक्के आहे.‎ उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण ९४.०५, तर‎ मुलांचे ९०.३२ टक्के आहे. या‎ निकालात मुलींनी बाजी मारली असून‎ त्यांचा निकाल मुलांच्या तुलनेत ३.७३‎ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना‎ काळातील निकालांच्या तुलनेत यंदाचा‎ निकाल ३.१२ टक्क्यांनी घसरला आहे.‎ २०२१ मध्ये ९९.३४, तर २०२२ मध्ये‎ ९४.९७ टक्के निकाल लागला होता.‎ यंदाचा ९१.८५ टक्के निकाल लागला आहे. बीड जिल्ह्याने यंदाही दुसरे स्थान‎ कायम राखले आहे. ३५ हजार ४४५‎ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जालना‎ जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या‎ तुलनेत यंदाचा निकाल २.०२ टक्क्यांनी‎ घसरला आहे. यंदा ३० हजार ६९३‎ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

यापैकी‎ २८ हजार २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले‎ आहेत. यात १६ हजार ८३८ मुले, तर ११‎ हजार ३६४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.‎ मुलांचा ९०.५७ तर मुलींचा ९३.७९‎ असा एकूण ९१.८८ असा निकाल‎ लागला असल्याची माहिती बोर्डाच्या‎ वतीने देण्यात आली.‎

शाखानिहाय निकाल‎ विज्ञान :

९६.५५ %‎ वाणिज्य : ९१.७२%‎ कला : ८४.४५ %‎ एचएससी व्होकेशनल : ८८.५१%‎ टेक्निकल सायन्स : ९०.८३ %‎ एकूण निकाल : ९१.८५ %‎

हिंगोली शेवटच्या स्थानावर‎ यंदा विभागातून हिंगोली जिल्हा‎ पिछाडीवर राहिला आहे. हिंगोलीतून‎ १२ हजार ९६५ विद्यार्थी परीक्षेसाठी‎ बसले होते. त्यापैकी ६ हजार १०६ मुले,‎ तर ५ हजार ८४ मुली उत्तीर्ण झाल्या‎ आहेत. जिल्ह्यातील ८३.०४ टक्के‎ मुले, तर ९०.५९ टक्के मुली उत्तीर्ण‎ झाल्या आहेत. एकूण ८६.३० टक्के‎ निकाल लागला आहे.‎

जिल्हानिहाय निकाल‎ छत्रपती संभाजीनगर :
९३.५६ %‎ बीड : ९३.४८ %‎ परभणी : ८७.९२ %‎ जालना : ९१.८८ %‎ हिंगोली : ८६.३ %‎ एकूण : ९१.८५ %‎

लातूर : निकाल ९०.३७%‎ नांदेड, धाराशिव व लातूर अशा तीन‎ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर‎ बोर्डाचा निकाल ९०.३७ टक्के लागला.‎ यात ८९ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी‎ परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी‎ ८८ हजार ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.‎ त्यापैकी ७९ हजार ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण‎ झाले. विभागात लातूर जिल्ह्याचा‎ सर्वाधिक ९२.६६ टक्के निकाल लागला.‎

हिंगोली शेवटच्या स्थानावर‎ यंदा विभागातून हिंगोली जिल्हा‎ पिछाडीवर राहिला आहे. हिंगोलीतून‎ १२ हजार ९६५ विद्यार्थी परीक्षेसाठी‎ बसले होते. त्यापैकी ६ हजार १०६ मुले,‎ तर ५ हजार ८४ मुली उत्तीर्ण झाल्या‎ आहेत. जिल्ह्यातील ८३.०४ टक्के‎ मुले, तर ९०.५९ टक्के मुली उत्तीर्ण‎ झाल्या आहेत. एकूण ८६.३० टक्के‎ निकाल लागला आहे.‎

शाखानिहाय निकाल‎ विज्ञान :

९६.५५ %‎ वाणिज्य : ९१.७२%‎ कला : ८४.४५ %‎ एचएससी व्होकेशनल : ८८.५१%‎ टेक्निकल सायन्स : ९०.८३ %‎ एकूण निकाल : ९१.८५ %‎

जिल्हानिहाय निकाल‎ छत्रपती संभाजीनगर :

९३.५६ %‎ बीड : ९३.४८ %‎ परभणी : ८७.९२ %‎ जालना : ९१.८८ %‎ हिंगोली : ८६.३ %‎ एकूण : ९१.८५ %‎

परभणीच्या ९१.८१ टक्के मुली झाल्या उतीर्ण‎
यंदा परभणी जिल्ह्याचा निकाल ८७.९२ एवढा लागला आहे. जिल्ह्यातून २३ हजार‎ ४४९ विद्यार्थी बसले होते. यातील ११ हजार २२३ मुले तर ९ हजार ३९३ मुली उत्तीर्ण‎ झाल्या आहेत. ८४.९१ टक्के मुले तर ९१.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.‎