आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मांतर न केल्याने मोगलांनी दोन लहान मुलांना भिंतीत पुरुन टाकले. त्यांनी धर्मासाठी जीव दिला. धर्माप्रति अशी निष्ठा ठेवली पाहिजे, असा संदेश त्यांनी जीवनातून दिला. म्हणून तुम्हीही धर्माशी एकनिष्ठ रहा, माणुसकीने वागा, असा संदेश उस्मानपुरा येथील गुरुसिंगसभा गुरुद्वाराचे सचिव कुलदीपसिंग निऱ्ह यांनी ५०० मुलांना दिला. या वेळी हरविंदरसिंग ब्रिंद्रा, जसपालसिंग ओबेरॉय, इंद्रजितसिंग छतवाल, प्रितपालसिंग ग्रंथी, हरविंदसिंग धोढी, खुनावीरसिंग उपस्थित होते.
मोगलांचीअशी आहे कहाणी मोगलांनी २० डिसेंबर १७०४ रोजी आनंदपूर साहिब किल्ल्यावर आक्रमण केले. या वेळी गुरुगोविंदसिंह पूर्ण परिवारासोबत किल्ल्यावर होते. लढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी किल्ला सोडला. सरसा नदी पार करताना गोविंदसिंहांचा परिवार त्यांच्यापासून दूर झाला. चार मुलांपैकी दोन मुले त्यांच्या आईसोबत राहून गेली. फितुरीमुळे आई आणि जोरावर सिंह, फतेहसिंह पकडले गेले. ‘इस्लाम कबूल करा’, असा जोर टाकला. पण त्यांनी नकार दिला. त्यांना २६ डिसेंबर १७०४ रोजी भिंतीमध्ये गाडण्यात आले. यंदापासून २६ डिसेंबरला बाल शहीद दिवस साजरा करण्याची घोषणा केंद्राने केली.
प्रत्येक गुरुद्वाऱ्यात सप्ताहभर कार्यक्रम केंद्र सरकारने २६ डिसेंबरला बाल शहिद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. नांदेड गुरुद्वारामध्ये सर्वात मोठा सोहळा होईल. शहरातील तिन्ही गुरुद्वारा मिळून आम्ही सप्ताहभर शहिदीबद्दल जनजागरण करणार आहोत. इंदरजितसिंग छतवाल, कोषाध्यक्ष उस्मानपुरा गुरुद्वारा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.