आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडची मागणी:आगामी निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात; निवडणूक आयोग, केंद्र सरकारलाही पत्र पाठवणार

प्रतिनिधी । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील विकसित राष्ट्र सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यायची असेल, तर भारतातील आगामी सर्व निवडणूका या मतपत्रिकेवरच घेतल्या जाव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

समविचारी पक्ष संघटनांना एकत्रित करून लढा यासाठी उभारला जाईल. निवडणूक आयोग व केंद्र सरकारकडेही आग्रही मागणी केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व कोकण शिक्षण आणि पदवीधार मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला आहे. यापैकी भाजपला फक्त एक जागेवर विजय मिळाला. लोक महागाई, करप्रणाली, चुकीच्या धोरणामुळे सत्ताधारी भाजपला कंटाळले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शिवाय हि निवडणूक मतपत्रिकेवर झालेल्या असल्यामुळे यामध्ये कुठलाही घोळ दिसत नाही. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घेतल्या जाव्यात, अशी मागणी डॉ. भानुसे यांनी केली आहे. यात सर्व पक्ष संघटनांनासोबत घेऊन लढा दिला जाईल, असेही ते म्हणाले.

ईव्हीएमला विश्वासाहर्ता नाही

ईव्हीएम मशीन कधीही बंद पडू शकते. त्यात फेरफार करुन मते वळवणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. त्या शिवाय भाजपला बहुमत मिळवणे शक्य नाही. कारण लोक खूप त्रस्त आहेत. रेल्वे, विमान, आदी सर्वांच्याच खाजीकरणाचा झपाटा सुरु आहे. महागाईवर बोलले जात नाही. खोटं पण रेटून बोलले जात आहे. देशातील वित्तीय तूट दुपटीने वाढली आहे. छोट्या छोट्या वस्तुंसाठी गोरगरीबांना जीएसटी भरावा लागतोय. त्यामुळे जनता कंटाळली आहे. असे असताना भाजप बहुमतात कसे येऊ शकते? याच कारणामुळे नुकतीच पार पडलेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून भाजपचा दारूण पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे नागपुरच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, यासाठी आम्ही लढा उभारणार असल्याचे डॉ. भानुसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...