आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:वजन वाढलेल्या तीस टक्के मुलांना‎ उच्च रक्तदाब, हृदयरोगाचाही धाेका‎

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎देशात स्थूल मुलांचे प्रमाण २.१‎ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत‎ पोहोचले आहे. विशेष म्हणजे‎ राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात ज्या ३३‎ राज्यांत मुलांमधील स्थूलता वाढली‎ आहे, त्यात महाराष्ट्र पहिल्या‎ क्रमांकावर आहे. आम्ही केलेल्या‎ २८६ मुलांच्या सर्वेक्षणात स्थुल मुलं‎ ३० टक्के , उच्च रक्तदाब‎ होण्यापूर्वीच्या अवस्थेत आहेत, तर‎ २० टक्के मुलांना उच्च रक्तदाबाची‎ समस्या सुरू झाली आहे. त्यामुळे ही‎ धोक्याची घंटा लक्षात घेऊन‎ जगण्याची शैली तातडीने बदला,‎ असा सल्ला बालस्थूलता निवारण‎ तज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले यांनी दिला.‎ सरस्वती भुवन प्रशालेच्या माजी‎ विद्यार्थी संघटनेने आयोजित‎ केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत‎ होत्या. डॉ. प्रीती यांना वर्ल्ड‎ ओबेसिटी फेडरेशनने राष्ट्रीय फेलो‎ म्हणून सन्मानित केले. ज्येष्ठ‎ पत्रकार आणि शालेय समितीचे‎ चेअरमन प्रमोद माने अध्यक्षस्थानी‎ होते. डॉ. प्रीती म्हणाल्या, उद्याच्या‎ जगाला आधार देणारी मुले सशक्त‎ असणे गरजेचे आहे. आपल्या‎ देशातही बालपणातील स्थूलपणाची‎ पातळी चिंताजनक होत आहे.‎ बालपणातील स्थूलतेची गुंतागुंत‎ होऊ नये यासाठी त्याबाबत जागृती‎ होणे गरजेचे आहे.‎

व्यायाम, आहार आणि सवयींची त्रिसूत्री‎
स्थूलता अानुवंशिकतेतून येते. तशीच ती आहाराच्या‎ चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, झोपेचे‎ बिघडलेले वेळापत्रक, मोबाइल, टीव्ही पाहण्याचे‎ व्यसन यातूनही निर्माण होते. मात्र, व्यायाम, आहार‎ आणि योग्य सवयी ही त्रिसूत्री पाळली तर स्थूलतेला‎ आळा बसेल आणि पुढील गुंतागुंत टाळता येईल.‎

स्थूलता समृद्धी नसून आजार‎
स्थूलतेला समृद्धी मानण्याचा गैरसमज आपल्या‎ समाजात आहे. मात्र, स्थूलता हा आजार उच्च‎ रक्तदाब, हृदयरोग, यकृतविकार, मासिक पाळीतील‎ अनियमितता, मनोविकार, मधुमेह अशा विविध‎ आजारांना आमंत्रण देणारा आहे.‎

बातम्या आणखी आहेत...