आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Two People Committed Suicide Under Train Aurangabadदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये‎ रेल्वेखाली दोघांची आत्महत्या‎

टोकाचे पाऊल:दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये‎ रेल्वेखाली दोघांची आत्महत्या‎, तणावातून संपवला जीव

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर‎ दोन वेगवेगळ्या घटनांत रविवारी दोघांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या‎ करत आयुष्य संपवले. यात पहिली घटना टाकळी शिवार, तर दुसरी‎ शिवाजीनगरात घडली.‎

गारखेड्यातील रामकृष्णनगरचे रहिवासी किशोर यशवंत पवार (४२) हे‎ मोंढा नाका येथील व्यावसायिकाकडे वरिष्ठ लेखापाल होते.

नक्की झाले काय?

शनिवारी‎ सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलाला सोडून ते पुढे गेले. मात्र, दुपारी जेवण‎ करण्यासाठी घरी गेलेच नाही. मुलाने त्यांना वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न‎ केला. मात्र, मोबाइल बंद होता. कुटुंबाने घाबरून पुंडलिकनगर पोलिस‎ ठाण्यात तक्रार दिली. मात्र, रात्री त्यांनी वरुड काजीजवळील टाकळी‎ शिवारात रेल्वे येताच रुळावर झोपून आत्महत्या केली.

घटनेची माहिती‎ नागरिकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत‎ त्यांच्याकडील कागदपत्रांवरून कुटुंबाशी संपर्क साधला.‎ याप्रकरणी चिकलठाणा पोलिस तपास करीत आहेत. ‎

तणावातून उचलले टोकाचे पाऊल

दुसऱ्या घटनेत‎ शिवाजीनगरचे रहिवासी भगवान विठ्ठल शिंदे ( ४७) यांनीही जीवन‎ संपवले. भगवान ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काही‎ दिवसांपासून आजारी असल्याने ते सतत तणावात असायचे. शनिवारी रात्री‎ शिवाजीनगर रेल्वे रुळावर त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी जवाहरनगर‎ पोलिस तपास करीत आहेत.‎