आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा दोन ऐवजी तीन प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएम केअर अंतर्गत दोन जागा राखीव असणार आहेत. असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आज सायंकाळी देण्यात आली.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालीली प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम यासाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रवेश प्रक्रियेत तीन ऐवजी दोनच प्रवेशासाठी फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे. ज्यानुसार आता यंदा पुन्हा प्रवेशासाठी दोन एवेजी तीन फेऱ्या राबविण्यात येणार आहेत.
याबरोबरच गेल्या वर्षी पासून ज्यांना हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून करायचे आहेत. त्यांना मराठी माध्यम निवडण्याची संधी देखील उपलब्ध असणार आहे. तर कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना पीएम केअर अंतर्गत प्रवेशात दोन जागा असणार आहेत.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेला प्रवेश
दरम्यान यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आणखी एक बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. आजवर त्यांना मर्यादित ब्राॅंचला प्रवेश घेता येत असे. आता मात्र त्यांना कोणत्याही ब्राण्चला यंदापासून प्रवेश घेता येणार आहे.
60 टक्के विद्यार्थ्यांकडून विचारणा
दहावीच्या निकालानंतर आता पुढील अभ्यासक्रमांच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांकडून विचारणा होतो आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये येणारा पालक आणि विद्यार्थी वर्ग हा करिअरच्या संधी पाहूनच अभ्यासक्रमांची विचारणा आणि निवड करत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ऑनलाइन कामांनाही आलेले महत्त्व लक्षात घेता. आता आयटी, कंम्प्युटर सायन्स या विषयांना 60 टक्के विद्यार्थी पसंती दर्शवत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.