आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:अंगणवाडी भरतीचा‎ प्रश्न युतीने साेडवला‎ ; कर्मचारी भरतीचे शिरीष बोराळकरांकडून स्वागत‎

छत्रपती संभाजीनगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अंगणवाडी सेविका व‎ अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन‎ आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा‎ दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न‎ मार्गी लावून शिंदे, फडणवीस‎ सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना‎ मोठा दिलासा दिला आहे. ३० हजार‎ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णयही‎ घेण्यात आल्याने महाविकास‎ आघाडीच्या नाकर्तेपणामुळे‎ रखडलेले शिक्षणाचे चक्र आता‎ रुळावर आले आहे, अशा शब्दांत‎ भाजपचे शहराध्यक्ष शिरीष‎ बोराळकर यांनी सरकारच्या निर्णयाचे‎ स्वागत केले आहे.‎ राज्याचे महिला बालकल्याण‎ विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी‎ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या‎ वेतनवाढीची, तसेच रिक्त जागांच्या‎ भरतीसंबंधीची विधिमंडळात घोषणा‎ केली.

त्यानुसार राज्यातील‎ अंगणवाडी सेविकांना दीड हजार‎ रुपयांची वेतनवाढ देण्यात येणार‎ आहे. त्याचबरोबर अंगणवाडी‎ कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन खरेदी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च‎ करण्याचा निर्णय राज्य शासनाने‎ घेतला आहे. काही दिवसांपूर्वी‎ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुंबईत‎ आंदोलन केले होते.‎ या निर्णयाचा लाभ विशेषतः ग्रामीण‎ भागातील बालकांना व कुटुंबांना‎ होईल, असा विश्वास बोराळकर‎ यांनी व्यक्त केला.‎

वयोमर्यादा वाढवून‎ तरुणांना दिलासा‎ प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च‎ माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या‎ सुमारे ६५ हजार रिक्त जागांपैकी ३०‎ हजार जागा भरण्याचा निर्णय घेऊन‎ गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली‎ भरती प्रक्रियाही सरकारने मार्गी‎ लावली आहे. याबरोबरच ७५ हजार‎ जागांवरील नोकरभरतीसाठी‎ वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून‎ सरकारने युवकांच्या रोजगाराच्या‎ संधी अधिक विस्तारल्या आहेत. या‎ निर्णयामुळे लाखो बेरोजगारांना मोठा‎ दिलासा मिळाला आहे, असेही‎ बोराळकर म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...