आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अवकाळी पावसाने संपवला यंदा गावरान आंब्याचा मेवा, फळांविना सुनीसुनी झाली झाडे; माेहर ते‎ फळधारणेवरच घाला

टाकळी जिवरग‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसाने यंदा ठराविक‎ अंतराने हजेरी लावल्यामुळे अांब्याचे‎ माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.‎ अगदी माेहर लागल्यापासून ते‎ फळधारणा झाल्यावरही अवकाळी‎ पावसाने धुमाकुळ घातला. त्यामुळे‎ ग्रामीण भागातील गावरान अांब्याचा‎ मेवा यंदा चाखता येणार नाही.‎

टाकळी जिवरग परिसरात अवकाळी‎ च्या तडाख्याने गावरान आंबा पूर्णत:‎ गळून पडला. यामुळे मे महिन्यात‎ बाजारपेठेत येणारा गावरान अांब्याचा‎ घमघमाट दिसत नाही. त्यामुळे‎ नागरिकांना इतर राज्यातील अांब्याची‎ चव चाखावी लागणार अाहे.‎

बाजारात कोकण, मध्यप्रदेश,‎ आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक‎ मधून आंबा मोठ्या प्रमाणात दाखल‎ झाला अाहे. त्यात मध्य प्रदेशातून‎ आलेला लालबाग, बैगनपल्ली आंबा‎ जास्त आहे. या आंब्याचे दर ५० रुपये‎ किलोच्या घरात भाव आहेत. केशर‎ आणि इतर आंब्याचे दर १०० ते १२०‎ रुपये किलो आहेत.‎ हापूस आंब्याचे दर यंदा ७०० ते २०००‎ रुपये पेटी पर्यंत आहेत.

मे महिन्यात‎ गावरान आंबा बाजारात विकायला‎ येतो. लाडू, खोबऱ्या, घोटी,‎ शेवळ्या, लाल्या अशा नानाविध‎ जाती अाहेत. प्रत्येक गावात वेगळ्या‎ नावाने गावरान अांबा विकला जातो.‎ हापूस आंब्यापेक्षाही त्याची वेगळी‎ चव असते; मात्र गावरान अांब्याचे‎ जतन झालेले नाही.

आंबा परिपक्व‎ होऊन पिकण्याच्या अवस्थेत‎ असताना मोठ्या प्रमाणात वादळी‎ वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे‎ अांब्याचे नुकसान झाले. त्यामुळे‎ झाडाला एकही आंबाही शिल्लक‎ नाही. यामुळे यंदा गावरान आंब्याची‎ चव चाखायला मिळणार नाही अशी‎ स्थिती अाहे.‎ एक पाऊस आल्यानंतर लोणच्याचा‎ गावरान आंबा उतरवला जातो; मात्र‎ अवकाळी पाऊस आणि वादळाने‎ फळ शिल्लकच राहिले नाही.

यामुळे‎ लोणच्यासाठी यंदा परीपक्व कैरी‎ मिळणार नाही अशी स्थिती आहे.‎ रसाळीच्या अांब्यासाेबत‎ लाेणच्यासाठीही यंदा परराज्यातील‎ कैरीवर अवलंबून राहावे लागणार‎ अाहे.‎ परराज्यातील अांब्यावर‎ रसाळी अवलंबून‎ गावखेड्यातील शेतशिवारात शेत‎ तेथे गावरान आंबा दिसतो. अनेक‎ ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही‎ बाजूने असंख्य आंब्याची झाडे‎ दिसतात.

उन्हाळ्यात गाव खेड्यात‎ गेल्यावर रसाळी म्हणजे रसाचा‎ बेत असलेले जेवण हमखास‎ मिळते; मात्र या आंब्याच्या‎ झाडांवर कुऱ्हाड चालली.‎ शिल्लक असलेल्या अांब्याचे‎ अवकाळीने नुकसान झाले.‎ त्यामुळे परराज्यातील आंब्यावरच‎ रसाळींचा पाहुणचार करावा‎ लागणार आहे.‎