आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:शेततळ्यात पडलेल्या चिमुकल्यास‎ वाचवायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणही‎ बुडाला

वैजापूर‎ ‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळ्यात बुडून‎ ‎ दोघांचा मृत्यू झाल्याची‎ ‎ घटना तालुक्यातील‎ ‎ बेलगाव शिवारात‎ ‎ रविवारी दुपारी घडली.‎ ‎ कपिल किरण त्रिभुवन‎ ‎ (२३) व पीयूष विजय‎ ‎ जिवडे (वय ८, रा.‎ ‎ नाशिक) अशी मृतांची‎ ‎ नावे आहेत.

जागरण‎ ‎ गोंधळ करणारे वाघे हे‎ ‎ कासली येथे कार्यक्रम‎ ‎ करण्यासाठी जात‎ ‎ असताना बेलगाव‎ ‎ शिवारात आराम‎ ‎ करण्यासाठी थांबले.‎ त्यांच्या सोबत असलेला चिमुकला पीयूष‎ विजय जिवडे हा खेळत असताना नकळत‎ बेलगाव शिवारातील गट क्रमांक १६० मधील‎ किरण पांडुरंग त्रिभुवन यांच्या शेतात गेला.‎ खेळताना तेथील शेततळ्यात तो पडला व‎ बुडू लागला.

हे लक्षात येताच कपिल‎ त्रिभुवनने चिमुकल्याला वाचवण्यासाठी‎ धाडसाने शेततळ्यात उडी घेतली. मात्र,‎ पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात‎ बुडला.‎ दुर्दैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.‎ याची माहिती मिळताच पोलिस नाईक‎ सिंगल व पोलिस पाटील अनिल धीवर यांनी‎ घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने‎ दोघांना बाहेर काढून वैजापूर उपजिल्हा‎ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय‎ अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित‎ केले.

कपिल हा एकुलता एक होता. तो‎ कोपरगाव येथील संजीवनी महाविद्यालयात‎ अभियांत्रिकीमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत‎ होता. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात‎ येत आहे.‎