आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील अंबाडी धरण ३१ आँगस्टला ओव्हरफ्लो झाले. यामुळे शिवना टाकळी प्रकल्पात येणाऱ्या सर्व नदीवरील छोटे-मोठे कोल्हापूर बंधारे ओसंडून वाहत आहे. दरम्यान, यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठा १.३९ टिएमसी क्षमता असलेला शिवना टाकळी हा सिंचन प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दररोज कमालीची वाढ असल्याने आज रोजी शिवना टाकळी सिंचन प्रकल्पाचा पाणीसाठा ८६.३२ टक्कावर आला आहे.
पाण्याचा हा विसर्ग असाच राहिला तर लवकरच हे शिवना प्रकल्प ओव्हरफ्लो होईल. प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा आल्यानंतर धरणाचे दरवाजे उघणार असल्याचे शिवना टाकळीचे शाखा अभियंता पुरुषोत्तम कडवे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. मागील वर्षाच्या आँक्टोबर महिन्यात हा प्रकल्प बारा वर्षानंतर पुर्ण क्षमतेने भरला होता. या वर्षी मात्र ३० आँगस्ट पर्यंत अवघा १८ टक्के जिवंत पाणीसाठा शिवना टाकळी प्रकल्पात शिल्लक होता. परंतु, ३० आँगस्टला कन्नड, चिंचोली लिबाजी, नाचनवेल, करंजखेडा, नागदमंडळात अतिवृष्टी झाली.
दरम्यान, ३१ आँगस्टला सकाळी ८ वाजता अंबाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आणि शिवना टाकळी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली. आठ दहा दिवसांत जवळपास पन्नास टक्के पाणीसाठा आल्याने पुढील वर्षाभरासाठी तरी चापानेर, गुदमा, टाकळी, वैसपुर, जळगाव घाट, हतनुर, टापरगाव, जैतापुर, अलापुर, अंतापुर, केसापुर, तांड पिपंळगाव, देभेगाव, बोरसर (खूर्द) बोरसर (बुद्रुक) या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा व परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.