आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकमंगल फाउंडेशनच्या वतीने धाराशिव येथे छायादीप मंगल कार्यालयात शनिवार सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपे विवाह बंधनात अडकले. विवाह सोहळ्याचे हे १८ वे वर्ष आहे. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.
वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनचे प्रणेते सुभाष देशमुख, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, युवा नेते मनिष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामराजे पाटील, दत्ता कुलकर्णी, व्यंकट गुंड, रामदास कोळगे, जयराजे निंबाळकर, सुधीर रास्ते, नाना लोमटे, बालाजी शिंदे व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, वधूवरांचे नातेवाईक व वऱ्हाडी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.