आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत:3 लाख ठेवीदारांचे 450 कोटी अडकले, 235 कर्मचाऱ्यांना वेतन नाही

चंद्रसेन देशमुख | धाराशिव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे व नातेवाईकाचे १ लाख ४६ हजार रूपये जिल्हा‎ बँकेत अडकले आहेत. बँक रक्कम देत नसल्यामुळे‎ आमची अडचण झाली आहे. बँकेत गेल्यानंतर पैसेच‎ नाहीत, एवढेच उत्तर मिळते.आमच्या हक्काचे पैसे‎ मिळत नसतील तर दाद कुणाकडे मागायची, असा‎ प्रश्न परंडा तालुक्यातील शिरसावचे युनूस पटेल‎ हतबल होऊन ‘दिव्य मराठी’कडे करत हाेते.‎ त्यांच्यासारखीच जिल्हा बँकेच्या सुमारे ३ लाख‎ ठेवीदारांची अवस्था झाली आहे.दुसरीकडे बँकेच्याच‎ २३५ कर्मचाऱ्यांना गेल्या ५ महिन्यांपासून वेतन‎ मिळालेले नाही.त्यामुळे बँकेची अवस्था अधिकच‎ बिकट होत आहे.‎ एकेकाळी राज्यात अग्रेसर असलेली धाराशिव जिल्हा‎ मध्यवर्ती सहकारी बँक आता शेवटच्या घटका मोजू लागली‎ आहे.

४५० कोटी रूपये बँकेकडे‎ अडकल्याने व हक्काची रक्कम‎ मिळत नसल्याने ठेवीदार‎ हवालदिल झाले आहेत. तर राज्य‎ शासनाने पंजाबराव देशमुख‎ व्याज सवलत अनुदान बंद‎ केल्यामुळे बँकेला दरवर्षी‎ मिळणारे ६ कोटी बंद झाले असून,‎ पगाराअभावी ५ महिन्यांपासून‎ बँकेच्या २३५ कर्मचाऱ्यांची‎ उपासमार सुरू आहे. दुसरीकडे‎ खर्च कमी करण्यासाठी म्हणून‎ बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन‎ प्लॅन दिला, त्यात ७४ पैकी २४‎ शाखा बंद करता येतील, असे‎ सूचविण्यात आले आहे.‎

कारखान्यांकडे ४५० कोटी थकले‎ जिल्हा बँकेची शेती आणि बिगर‎ शेती कर्जाची येणे रक्कम आठशे‎ कोटीपर्यंत अाहे.मात्र, ५‎ कारखान्यांकडे ४५० कोटी थकित‎ आहेत. त्यापैकी तेरणा आणि‎ तुळजाभवानी साखर कारखाना‎ भाडे तत्वावर देण्यात आल्यामुळे‎ कर्जाची रक्कम हळुहळू वसूल‎ होईल. विविध संस्थांना देण्यात‎ आलेले ३५० कोटींच्या कर्जाची‎ अनिष्ठ तफावत आहे. म्हणजेच‎ हे कर्ज बुडल्यात जमा आहे.‎ त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात,‎ अशी बँकेची अवस्था आहे.‎

शासन निर्णयामुळे उत्पन्न‎ आटले, अडचणी वाढणार‎
जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा आधार‎ होता.आर्थिक घोटाळ्यानंतर बँकेची स्थिती‎ खालावली. त्यानंतर बँकेने ५५ हजार‎ खातेदार शेतकऱ्यांचे पीककर्जाचे कागदोपत्री‎ नुतनीकरण करून ३ टक्के व्याजदरानुसार‎ शासनाकडून दरवर्षी ६ कोटी रूपये घेतले‎ जात होते.मात्र, ९ नोंव्हेंबर २०२२ च्या शासन‎ निर्णयानुसार जिल्हा बँकेला हे व्याज अनुदान‎ बंद करण्यात आले आहे.उत्पन्न आटल्याने‎ बँकेची अडचण अधिकच वाढणार आहे.‎

अशी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सद्यस्थिती‎
कर्मचारी भरती बंद, काहींनी घेतली स्वेच्छा‎ गेल्या पाच वर्षांत बँकेची स्थिती वर्षागणिक‎ दोलायमान होताना दिसत आहे. यादरम्यान‎ ९६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर‎ काहींनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे.‎

जिल्हा बँकेच्या एकूण ७४ शाखा‎ आहेत.त्यापैकी २४ शाखा केवळ एकाच‎ कर्मचाऱ्यांवर चालू आहेत. कमी होणारी‎ आर्थिक उलाढाल व वाढता खर्च बघता‎ बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन प्लॅन दिला.

एकेकाळी मजबूत आर्थिक स्थिती‎ असलेल्या जिल्हा बँकेचा राज्यात‎ नावलौकिक होता. आता मात्र बँकेचा कणा‎ मोडून पडला असून, लोकप्रतिनिधी,‎ शासनाकडून बँकेकडे दुर्लक्ष होत आहे.‎

बँकेच्या प्लॅननुसार २४ शाखा कमी केल्यास‎ बँकेचा खर्च वाचेल, असे सूचविण्यात आले.‎ मात्र, संचालक मंडळाकडून शाखा कमी‎ करण्यासाठी विरोध होत असल्याचे‎ सांगण्यात येत आहे.‎

वसुली करण्यावर भर द्यावा‎
जिल्हा बँकेला उत्पन्नाचे साधन नाही. कर्ज वसूल‎ केल्यास कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकेल. दिवाळीत‎ २५ हजार दिल्यानंतर कर्मचारी, ठेवीदारांना देण्यासाठी‎ पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.‎ विजयकुमार घोणसे-पाटील, एमडी, डीसीसी.‎

बातम्या आणखी आहेत...