आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा‎:हवाई सहलीच्या पात्रतेसाठी जिल्ह्यात‎ 6276 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा‎

धाराशिव / ईट‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळांमधील पाचवी‎ व आठवीच्या विद्यार्थ्यांची‎ श्रीहरिकोटा, बेंगळुरू केरळ या‎ ठिकाणी हवाई सहल निघणार आहे.‎ यासाठी पात्र होण्यासाठी पहिल्या‎ टप्प्यातील परीक्षा सोमवारी पार‎ पडली. यासाठी जिल्ह्यातील ६‎ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले‎ होते. रात्री उशिरापर्यंत केंद्रनिहाय‎ दिलेल्या विद्यार्थ्यांचे आकडे‎ संकलित करण्याचे काम सुरू होते.‎ एकूण ६२७६ विद्यार्थी परीक्षेसाठी‎ बसले व १०४ गैरहजर राहिले.‎

यासाठी तीन टप्प्यामध्ये परीक्षा‎ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या‎ शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक‎ दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना‎ शास्त्रज्ञांच्या कार्य पद्धतीची ओळख‎ व्हावी, राष्ट्रीय पातळीवरील‎ संशोधन प्रकियेची माहिती मिळावी,‎ या हेतूने इस्रोच्या अंतराळ संशोधन‎ संस्थेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातून‎ २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात‎ येणार आहे. यासाठी पहिल्या‎ टप्प्याची परीक्षा ८० केंद्रांच्या स्तरावर‎ सोमवारी पार पडली.

यामध्ये ७‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी‎ परीक्षा दिली आहे. ईट व निपाणी‎ केंद्रामधून १८४ विद्यार्थ्यांनी ही‎ परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा‎ दुसरा टप्पा दि. १३ मार्च रोजी‎ तालुका स्तरावर होणार आहे.‎ तिसरा व शेवटचा टप्पा दि. २० मार्च‎ रोजी जिल्हास्तरावर होणार आहे.‎ यातून गुणवंत विद्यार्थी या हवाई‎ सफरीसाठी पात्र होणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...