आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील १५ वर्षीय मुलीस अलमप्रभू नगरातील अविनाश भारती याने वारंवार प्रेमपत्र देत व फोनवर त्रास दिला. यामुळे या मुलीने २४ नोव्हेंबर १४ रोजी विष घेत आत्महत्या केली होती. तक्रारीवरून भूम पोलिसांनी आरोपी भारती याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करून भूम पोलिसांनी आरोपीविरुद्ध भूम न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
प्रकरणाची सुनावणी भूम येथील सत्र न्यायधीश एस. आर. पाटील यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. परंतु आरोपीतर्फे अॅड. सिराज मोगल यांनी केलेला युक्तिवाद व बचाव गृहीत धरून पाटील यांनी भारती यांची निर्दोष मुक्तता केली. अॅड. सिराज यांना अॅड. सोहेल शेख, अॅड, तौफिक शेख, अॅड. सतीश कालवटकर, अॅड. हुसेन सय्यद व अॅड. किशोर डोंबाळे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.