आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:ऊसाच्या उत्पन्नासह साखरेच्या उताऱ्यावरही‎ परिणाम, मार्च-एप्रिलपर्यंतच होणार गाळप‎

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎यंदा पावसाळ्यात सलग तीन महिने‎ रिपरिप आणि सततच्या ढगाळ‎ वातावरणामुळे उसाचा फुटवा झाला नाही.‎ यामुळे जवळपास ४० टक्के उत्पादन घटले‎ असून एकरी ३० टन ऊस निघत आहे.‎ कमी ऊस निघत असल्याने मार्च,‎ एप्रिलमध्येच यंदाचा गळीत हंगाम‎ संपण्याची शक्यता आहे. यंदा जवळपास‎ सर्वच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस‎ कमी पडण्याची शक्यता आहे.

यामुळे‎ शेतकरी हवालदिल झाला असून‎ मजुरांनाही कमी दिवस मजुरी मिळणार‎ आहे.‎ उमरगा तालुक्यात कधी दुष्काळ, कधी‎ ओला दुष्काळ, अतिवृष्टी, गारांचा‎ अवकाळी पाऊस आदी निसर्गाचे दुष्टचक्र‎ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.‎ परिणामी, शेतीच्या उत्पादनात कमालीची‎ घट झाली आहे. यातच खत व‎ बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती,‎ शेतीमालाला मिळणारे कमी दर यामुळे‎ शेती करणे जिकरीचे झाले आहे. यंदाच्या‎ वर्षी सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि‎ परतीच्या पावसाने उत्पादन खर्चही निघत‎ नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.‎ जिल्ह्यात सहकारी आठ तर खासगी आठ‎ साखर कारखाने आहेत. यापैकी‎ विठ्ठलसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे‎उमरगा तालुक्यातील शिवारात उसाच्या फडात कोयत्याचा जोर वाढला आहे.‎

दोन साखर कारखाने सुरू असून लोहारा‎ येथील लोकमंगल व भाऊसाहेब बिराजदार‎ साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे.‎ तालुक्यात सोलापूर येथील मातोश्री,‎ कंचेश्वर तुळजापूर यांनी शिरकाव केला‎ आहे. सलग दोन ते अडीच महिने सततचा‎ पाऊस असल्याने ऊस पिकाला‎ सूर्यप्रकाशाची कमतरता भासली. यामुळे‎ उसाची वाढ खुंटली असून हेक्टरी सरासरी‎ ३५ ते ४० टक्के घट येत आहे. परिणामी‎ मार्चमध्ये सर्वच कारखाने बंद होण्याची‎ शक्यता आहे. तालुक्यातील उसाची काही‎ वाढ झाल्याने गाडीचा माल करण्यासाठी‎ जवळपास एक एकर फड तोडावा लागतो.‎ तालुक्यातील दोन साखर कारखाने सुरू‎ झाले असून तुळजापूर, सोलापूर व लोहारा‎ तालुक्यातील कारखान्यांनी शिरकाव‎ केल्याने शेत शिवारात ऊस तोडणी सुरुवात‎ झाली आहे. अद्याप दराचा तिढा सुटला‎ नसला तरी उत्पादित ऊस तोडण्यासाठी‎ शिवारात उसतोडीच्या टोळ्या दिसत आहेत.‎ गाडीला लवकर माल करण्यासाठी कोयतेही‎ लवकर कामाला लागतात. तोडलेला ऊस‎ कारखान्याकडे घेवून जाण्यासाठी ट्रॅक्टर,‎ ट्रक अन् बैलगाड्यांची वर्दळ वाढली असून‎ शिवारात उसाच्या फडासोबत कारखान्यांची‎ ठिकाणे शेतकरी, कामगार आणि वाहनांची‎ वर्दळ वाढली आहे.

दरम्यान, आता ऊस‎ तोडणी मजुरांना पर्याय म्हणून मागील दोन‎ वर्षांपासून ऊस तोडणी यंत्राचा उपयोग सुरू‎ करण्यात आला आहे. सव्वा कोटीची‎ गुंतवणूक करून अनेक शेतकरी ऊस‎ तोडणी यंत्र खरेदीकडे वळले आहेत.‎ बहुतांश कारखान्यांवर सुरू असलेल्या ऊस‎ तोडणी यंत्राची वाहने दोन-तीन दिवसानंतर‎ रिकामी होत आहेत. यामुळे त्याचा‎ व्यवसायावर परिणाम होत आहे. सर्वच‎ साखर कारखान्यांवर जवळपास अशीच‎ परिस्थिती असल्याने यंदाच्या हंगामात‎ ज्यांनी तोडणी यंत्र खरेदी केले आहे, त्यांना‎ बँकेचा हप्ता आणि व्याज परताव्याचा‎ धसका भरला आहे.‎

कारखान्यांकडून यावर्षी अद्यापही‎ ऊसाचा दर जाहीर नाही‎
उमरगा-लोहारा तालुक्यात तीन साखर कारखाने सुरू‎ आहेत. दरम्यान, मागील वर्षी भाऊसाहेब बिराजदार‎ कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला दोन हजार‎ पाचशे रुपये सर्वाधिक भाव दिला होता. यंदाच्या‎ वर्षात अद्याप दर जाहीर झालेला नाही. लोकमंगल‎ कारखान्याने पहिला हप्ता दोन हजार दोनशे रुपयांचा‎ दिला तर विठ्ठलसाई कारखान्याच्या वतीने दोन हजार‎ तीनशे रुपयांचा पहिला हप्ता काढण्यात आलेला‎ आहे.

बातम्या आणखी आहेत...