आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:पांगरदरवाडीत 11 वर्षांपासून बंद अंगणवाडीने घेतला मोकळा श्वास‎

तामलवाडी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील‎ अंगणवाडी (क्रं. ८०४) मागील अकरा वर्षांपासून‎ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने बंद होती.‎ यामुळे चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.‎ या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतीच्या नूतन‎ पदाधिकाऱ्यांनी पाहिल्याच ग्रामसभेत धाडसी निर्णय‎ घेऊन अंगणवाडी अतिक्रमणमुक्त केली. यामुळे‎ चिमुकल्यांचा ज्ञानार्जनाचा प्रश्न सुटला आहे.‎ २००८ मध्ये जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत‎ पांगरदरवाडी येथे नवीन इमारत उभारली होती. या‎ अंगणवाडीत चिमुकल्यांनी सलग दोन वर्षे ज्ञानार्जन‎ केले होते. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे ही‎ अंगणवाडी बंद पडली होती. मागील ११ वर्षांपासून‎ या अंगणवाडीला पर्यायी व्यवस्था म्हणून तत्कालीन‎ पदाधिकाऱ्यांनी भाड्याच्या खोलीत अंगणवाडी‎ सुरू केली होती.

अंगणवाडी बंद असल्याबाबत‎ अनेकदा वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात‎ आला. मात्र, प्रश्न कायम होता. शुक्रवारी (दि.३)‎ ग्रामंपचायतीची पहिलीच ग्रामसभा होती. यात‎ अंगणवाडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.‎ उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी‎ अतिक्रमणधारकांच्या अडचणी जाणून घेतल्या.‎ यातून सुवर्णमध्य काढत अंगणवाडी भोवती झालेले‎ अतिक्रमण काढले. यामुळे ११ वर्षांपासून प्रलंबित‎ प्रश्न काही तासातच सोडवला गेला.‎ बाॅन्ड गहाळ झाल्याने झाला होता वाद‎ अंगणवाडीचे बांधकाम करण्यापूर्वी तत्कालीन ग्रापं.‎ पदाधिकाऱ्यांनी १०० रुपयांच्या बाॅन्डवर मूळ‎ मालकाकडून जागा घेतली होती. याची ग्रामपंचायत‎ दफ्तरी नोंदही आहे. मात्र, तो बाॅन्ड गहाळ झाल्याने‎ तत्कालीन पदाधिकारी व जागा मालकात वाद होऊन‎ ही अंगणवाडी बंद पडली होती. नवनियुक्त सरपंच,‎ उपसरपंच, सदस्य व तरुणांनी जागा मालकाची‎ समजूत काढून अंगणवाडी अतिक्रमणमुक्त केली.‎

सीईओ गुप्ता यांच्याकडूनही अभिनंदन‎ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता सहा‎ महिन्यांपूर्वी गावात आले होते. त्यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांच्या‎ कानावर हा प्रश्न घातला होता. त्यांनी तुळजापूरचे गटविकास‎ अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या.‎ सहायक गटविकास अधिकारी राऊत यांनी घटनास्थळी जाऊन‎ अहवाल तयार केला होता. त्यापूर्वीच नूतन ग्रापं. पदाधिकाऱ्यांनी हा‎ प्रश्न सोडवल्याने सीईओ राहुल गुप्ता यांनीही अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...