आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या बससेवेला ७४ वर्षे पूर्ण झाले असून “लालपरी”ने अमृत मोहत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल बसस्थानकात बुधवार (दि. १) आगार व्यवस्थापक, कर्मचारी व प्रवासी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाने १ जून १९४८ रोजी जनतेच्या सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. सेवेस ७४ वर्षे पूर्ण झाले. चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केला तसेच वयोवृद्ध, अपंगांसाठी सवलतीच्या दरात प्रवासाची सोय केली अल्पअवधीत जनतेसाठी “लालपरी” झाली. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी बसची सेवा सुरू झाली. प्रवाशांचे स्वागत गुलाबपुष्प व पेढे देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी बसस्थानकात आकर्षक रांगोळी काढून नियंत्रण कक्ष तसेच बसस्थानकात सजावट करण्यात आली होती. पत्रकार आनंद खर्डेकर व सुरेश घाडगे यांच्या हस्ते बसचे व फलकाचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाण्यासाठी मोफत पासची सुविधा करण्यात आली आहे.यावेळी आगार प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक गोरख खराटे, वाहतूक नियंत्रक एस. पी. करे, कासीम मुलानी, जुल्फेकार जिनेरी, उमेश पालके, आगार लेखाकार दीपक चैतन्य, प्रकाश काशीद, शिवलकर आदीसह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.