आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्यास शेतकरी नेते विनायकराव पाटील यांचा नम्रपणे नकार दिला. तेलंगणा राज्य निर्मीतीनंतर नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यासाठी किसानबंधू योजना राबवून शेतकऱ्यांचा विमा सरकारतर्फे उतरवून शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज दिली.
त्यामुळे तेलंगणा राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्या शेतीविषयक व सामाजिक कामाची दखल घेत दोन वेळा हैदराबाद येथे चर्चेसाठी बोलावले व शेतीविषयावर व देशाच्या भविष्यातील विषयावर चर्चा केली. ती केली.विनायकराव पाटील ३० वर्षापासून कुठल्याही राजकिय पक्षासोबत काम केले नाही म्हणून त्यांच्या विनंतीचा आदर ठेवून नम्रपणे त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.