आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीत बसून चहा घेतला. दरम्यान, कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पीक विमा, अतिवृष्टीतील अनुदान मिळत नसल्याची व्यथा मांडली. त्यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले बच्चू कडू गुरुवारी (दि.२) उस्मानाबादेत आले होते.
त्यांनी युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांगासह अन्य प्रश्न आक्रमकपणे समोर आणले. त्यांच्यावर विविध आंदोलनातील दीडशे ते २०० गुन्हे आहेत. यातील एका गुन्ह्यातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी उस्मानाबाद काेर्टात आले होते. दरम्यान, त्यांनी कोर्टासमोरील मल्लिनाथ सारने यांच्या टपरीत बसून चहा घेतला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा, अतिवृष्टीतील अनुदानासह इतर व्यथा मांडल्या.
... तेव्हा बेरगवाले फुटू जातील
बच्चू कडू यांना माध्यमांनी अर्थसंकल्प व इतर प्रश्न विचारले. तुम्ही सेनेची साथ सोडली. त्यांच्यासोबत वंचित, संभाजी ब्रिगेड आले, असा प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले, त्यांनी सेनेसोबत वंचित, ब्रिगेड हे राजकीयदृष्ट्या एकत्र आले का? त्यांचे काही मुद्दे ठरले आहेत का? काहीच ठरले नाही. जेव्हा अंतर्मनातून रंग बाहेर येईल तेव्हा बेरंगवाले फुटून जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.