आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी येथील तहसील कार्यालयात झाली. यात १३ पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
तालुक्यातील वडगाव गांजा ग्रामपंचायत अविरोध निघाली आहे. त्यामुळे सास्तूर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपूर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८ ) मतदान घेण्यात आले. मतमोजणी करिता आठ टेबलवर एकूण आठ फेऱ्या झाल्या.
सास्तूर गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील या सास्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आल्या. तसेच जेवळी गटाच्या माजी जि. प. सदस्या महानंदा पनुरे ह्या जेवळीच्या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
निवडून आलेले सरपंच खालीलप्रमाणे
वडगाव (गांजा)
अविरोध अनुराधा दनाने
माळेगाव वैभव पवार,
तोरंबा यादव चव्हाण,
विलासपुर पांढरी मारुती कार्ले,
नागुर अर्चना कांबळे
सास्तुर शितल पाटील,
जेवळी महानंदा पनुरे,
हिप्परगा (रवा) अभिमान कांबळे,
माकणी स्वाती साठे,
सालेगाव भाग्यश्री पाटील,
वडगाववाडी सोनाली गाडेकर,
अचलेर कांताबाई सोलंकर
उंडरगाव सोनाबाई वाघमारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.