आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगायचे कसे:वृद्धापकाळ व विधवा निवृत्ती योजनेतील‎ केंद्रीय अनुदान दहा महिन्यापासून नाही‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ‎ निवृत्तिवेतन योजना, व इंदिरा गांधी राष्ट्रीय‎ विधवा निवृत्ती योजनेतील केंद्राच्या‎ हिस्साचे अनुदान मागील दहा‎ महिन्यापासून मिळालेले नसल्यामुळे‎ निराधार यांना राज्याकडून मिळणाऱ्या‎ अनुदानावर आपले उदरनिर्वाह‎ भागवण्याची वेळ आली आहे.‎ निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग,‎ शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार‎ विधवांना आर्थिक आधार मिळावा,‎ निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे,‎ यासाठी शासनाकडून निराधार‎ नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या‎ जातात, दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने‎ योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना‎ आर्थिक मदतही करणे आवश्‍यक आहे.‎ जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर‎ करता येईल.

त्यांना सन्मानाने जगता यावे‎ हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन शासनाने‎ सन १९८० पासून संजय गांधी निराधार‎ योजना सुरू केली.‎ त्यानंतर भूमिहीन शेतमजूर महिला,‎ निराधार विधवांचे जीवनमान‎ उंचावण्यासाठी १९९१ पासून इंदिरा गांधी‎ राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तर ६५‎ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये‎ श्रावणबाळ सेवा योजना सुरू केली. या‎ योजनेतील अनुदान बँका मार्फत वाटप‎ करण्यात येते.

या मध्ये केंद्र व राज्य‎ सरकार मिळून अनुदान देते. त्यामुळे‎ निराधारांना आधार मिळत आहे.‎याबाबत कळंबचे नायब तहसीलदार‎ मुस्तफा खोंदे म्हणाले की, इंदिरा गांधी‎ राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती‎ योजनेतील राज्याच्या हिस्साचे अनुदान‎ वाटप करण्यात आले आहे, केंद्राच्या‎ हिस्साचे अनुदान आल्यावर तात्काळ‎ वाटप करण्यात येईल. वृद्ध आणि निराधार‎ अनेक आहेत. त्यांच्या सर्व आशा केंद्र‎ सरकारच्या हिश्शावर अवलंबून आहेत.‎ त्यामुळे सरकारने याचा विचार करावा‎ अशी मागणी करण्यात येत आहे.‎

राज्याच्या अनुदानावरच सध्या उदरनिर्वाह चालू‎ कळंब तालुक्यात श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेत ५८६४‎ लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना ४५११ लाभार्थी, इंदिरा गांधी‎ राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना ७४८५ लाभार्थी, इंदिरा‎ गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ४१ लाभार्थी आहेत.

इंदिरा‎ गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत राज्य सरकार कडून‎ ८०० रुपये व केंद्र सरकार कडुन २०० रुपये असे एक हजार रुपये‎ देण्यात येते, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना मध्ये‎ सरकार कडून ७०० रुपये व केंद्र सरकार कडून ३०० रुपये असे‎ एक हजार रुपये दिले जातात.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ‎ निवृत्तिवेतन योजनेतील केंद्राचे २०० रुपये अनुदान, इंदिरा गांधी‎ राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेतील केंद्र सरकार कडुन ३०० रुपये‎ अनुदान मागील एप्रिल महिन्यापासून केंद्राचे अनुदान आलेले‎ नाही. त्यामुळे या योजनेतील निराधारांना राज्याच्या अनुदानावर‎ उदरनिर्वाह भागवावं लागत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...