आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजाभवानी मातेची वर्षातील दुसरी सर्वात मोठी "चैत्र पौर्णिमा यात्रा ३ ते ७ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना संकटानंतर भाविकांच्या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चैत्र पौर्णिमा यात्रेचे नियोजन करण्याचे प्रशासना समोर आव्हान असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवानंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्र पौर्णिमा यात्रेकडे पाहिले जाते. उन्हाळ्याची सुटी तसेच शेतीची बहुतांश कामे आटोपली असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात भाविकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासह कमी कालावधीत सुलभ दर्शन उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.
चैत्र पौर्णिमा यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर संस्थानसह नगरपालिका, पोलिस, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, महावितरण आदी विभागांना उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा ५ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून रात्री पौर्णिमेनिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. छबिना मिरवणुकीनंतर महंतांच्या जोगव्याने पौर्णिमेची सांगता होईल. चैत्र पौर्णिमा यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.